HW News Marathi
Uncategorized

भगवा दहशतवाद देशात सक्रीय

चेन्नई – कमल हसन हे दक्षिणेतले अमिताभ…ते सध्या अभिनयातून राजकारणात येवू पहात आहेत. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी हिंदू दहशतवादावर केलेलं भाष्य बोलकं आहे. त्यांच्या या भाष्यानं खळबळ उडाली आहे.

उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे’, असा थेट आरोप कमल हसन यांनी केला आहे.

तामिळ भाषेतील साप्ताहिकात कमल हसन यांनी हा स्फोटक लेख लिहिला आहे. ‘हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत’, असं सांगतानाच ‘जनतेचा सत्यमेव जयते’वरील विश्वास उडाला आहे’, असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे. ‘तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे’, असं सांगत त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.

कमल हसन यांच्या या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हसन यांना अत्यंत कठोर शब्दांत लक्ष्य केलं आहे. ‘कमल हसन हे नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. हिंदू दहशतवादा’चा कोणताही पुरावा नाही,’ असं स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी शाळेच्या विश्वस्ताला अटक

News Desk

‘तो’ पुन्हा येतोय कपिल शर्मा शोमध्ये

News Desk

महिलेला पाहून अश्लिल चाळे करणारा अटकेत

News Desk
मुंबई

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk

भाजपच्या आश्वासनाचा फुगा जनताच फोडेल

मुंबई छत्रपतीं का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ असे निवडणुक काळात ब्रीदवाक्य घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नाही याचाच अर्थ हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले आहे. परंतु हा भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल असा माझा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मीलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने घेतला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येताना महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान सरकारने केला आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असा आरोपही मलिक यांनी केलाय.

Related posts

अंधेरीमधील एसआरएच्या इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू

News Desk

आयात उमेदवाराच्या जिवावर भाजपचा भांडूपमध्ये विजय

News Desk

आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

News Desk