HW News Marathi
Uncategorized

शरद पवार हेच शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, लक्षात घ्या | अजित पवार

मुंबई | “लोकसभेत जे केले ते विधानसभेत करु नका. फक्त शरद पवार हेच शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, हे लक्षात घ्या. आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू आणि राज्यात शिवस्वराज्य स्थापन करू”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. राज्यात निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा १९ ऑगस्टपासून पैठण येथून पुन्हा सुरु करण्यात आली. आज (२२ ऑगस्ट) जिंतूर येथे पोहोचलेल्या या शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

“हे सरकार माझाही विचार करते ! ही भावना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्या मनात निर्माण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे”, अशी खोचक टीका अजित पवार यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे, माहिती अधिकारात बदल करण्याच्या सरकारच्या निर्णयावर देखील अजित पवार यांनी टीका केली आहे. “भाजपने माहिती अधिकार कायदा संपवला असताना आमचे सरकार असताना आंदोलन करणारे समाजसेवक आता कुठे आहेत ? आता त्यांची दातखिळी बसली का ?” असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठे अडचणी, कुठे दिलासा! Sameer Wankhede प्रकरण कुठपर्यंत आलंय?

swarit

पुणे ICICI बॅंकेचे 2 एटीएम फोडले, 39 लाख लंपास

News Desk

Budget 2019 : पेट्रोल-डिझेल लीटरमागे १ रुपयांनी महागणार

News Desk