HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची निवडणूक आयोगासंदर्भातील ‘ही’ याचिका फेटाळली

मुंबई | पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (election commission of india) निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळली आहे. निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय तातडीने घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठविल्यानंतर ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पक्षाचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेत असल्याचे न्यायालयाने आज (15 नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाने अंधेरी पोटनिवणुकीपूर्वी धनुष्यबाण पक्षाचे चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव गोठविले होते.  या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनी लेखी निवेदन व पुराव्याच्या आधारे निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी धनुष्यबाण पक्षाचे चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव तात्पुरते गोठविले होते. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठववे हा निर्णय बेकायदा असून या निर्णयाने पक्षाचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्यापूर्वी सर्व कागदपत्रांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय हा निर्णय घेता येणार नाही, असे युक्तवाद आज सुनावणीदरम्यान करण्यात आला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, पाकिस्तानची मागणी

News Desk

पावसासाठी दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह

News Desk

लखीमपूर हिंसाचारानंतर योगी सरकारची मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरीची घोषणा

News Desk