HW News Marathi
Uncategorized

एल व एन विभागातील नागरीकांनी पाणी उकळून प्यावे- पालिका

मुंबई : येत्या सात दिवसात एल आणि एन वॉर्ड मधील लोकांनी पाणी उकळून पिण्याचे पालिकेने आवाहन केले आहे. मुंबईत गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ही सूचना जारी केली आहे. घाटकोपर जलाशयाच्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलाशय ७ मे पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना होणार आहे.

विशेषतः बीएमसीच्या एल आणि एन या विभागांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच प्रामुख्याने कुर्ला आणि घाटकोपर भागातील नागरिकांनी येत्या ७ तारखेपासून पुढचा आठवडाभर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल!

Ruchita Chowdhary

तुरूंगात जागा नाही म्हणून मला संपवण्याची भाषा करतायेत – कमल हसन

News Desk

Eknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाला माहिती

Seema Adhe
राजकारण

कर्नाटकच्या  विकासासाठी काँग्रेसला विजयी करा

News Desk

बेळगाव | भाजपकडे कर्नाटकच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही ठोस धोरण नसल्याचे सांगत सत्ता भाजपच्या हातात दिल्यास फक्त रेड्डी बंधूंचा विकास होईल, कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेसला विजयी करा असे आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केले. कर्नाटकच्या प्रचार दौ-यावर आहेत. त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. ही लढाई लोकशाही विरूध्द हुकुमशाहीची लढाई आहे. भाजपला पराभूत करून लोकशाहीचे रक्षण करण्याची क्षमता फक्त काँग्रेस पक्षाकडेच आहे. जेडीएस आणि इतर पक्षांकडे नाही. जेडीएस ही भाजपची बी टीम असून जेडीएसला दिलेले मत म्हणजे भाजपला मत आहे.

सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी दिली, कोणीही उपाशीपोटी राहू नये म्हणून गरिबांना अल्पदरात भोजन देणारी इंदिरा कँटीन योजना सुरु केली, गरिब, दलित,अल्पसंख्यांक समाजासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक वेगाने प्रगती करित असून कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

 

Related posts

असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखी पाहिजे !

News Desk

शिवसेना कोणालाही घाबरत नाही !

Arati More

शहा-फडणवीस भेटीत मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा ?

Gauri Tilekar