HW News Marathi
Uncategorized

गांधींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांचा विजय ही देशासाठी चिंतेची बाब !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला ३५२ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. यात पुन्हा एकदा पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत दोरदार पराभव सहन करावा लागला. देशभरात आज महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या विचारधारेचा विजय झाला आहे. गांधी विचार देशात हरले असून गांधींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांचा विजय ही देशासाठी चिंतेची बाब आहे, काँग्रेसचे ज्येष्ठे नेते दिग्विजय सिंह यांनी पराभवानंतर दिलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांना ३ लाख ६४ हजार ८२२ मतांनी पराभव केला. भोपाळच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवत दिग्विजय सिंहांचा लाखो मतांनी पराभव केला. भोपाळमधील विजय हा मोदींच्या विश्वासाचा विजय आहे. त्यांनी सामान्य लोकांसाठी जी कामे केली. त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे असे, प्रज्ञा सिंह यांनी सांगितले.

 

प्रज्ञा सिंह यांनी एका मालवाड जिल्ह्यातील एका रोड शोदरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हे स्वतंत्र भारतातील पहिले दहशतवादी होता,’ असे वादग्रस्त विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केले होते. यानंतर संपूर्ण प्रकरण देशभरात वादविवाद पाहायला मिळत आहेत.

तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेतील मोदींच्या भाषणात फक्त ‘नेहरुं’च्या नावाचा उल्लेख

swarit

Sharad Pawar | देशात परिवर्तनासाठी अनकूल वातावरण !

News Desk

मुंबई, माझा तुझ्यावर भरोसा हाय, मलिष्काचा महापालिकेला पुन्हा फटका

News Desk