HW News Marathi
Uncategorized

Uddhav Thackeray | सत्तेत सगळं समसमान असलं पाहिजे !

बुधवारी शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला मुंबईच्या शन्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे ब्रीद घेऊन ५३ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. कालचा हा कार्यक्रम विशेष होता तो यासाठी की शिवसेनेच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. शिवसेनेचे आजवरचे ५२ वर्धापनदिन मेळावे पाहिले, तर त्यात अन्य पक्षाचा कुणी नेता खास आमंत्रित केल्याचं ऐकिवात नाही. अनेक वर्षं बाळासाहेबांचं खास ‘ठाकरी भाषण’ हेच या मेळाव्याचं आकर्षण असायचं. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातून पक्षाची भूमिका मांडण्यास सुरुवात केली. ‘आपल्यात सगळं समसमान असलं पाहिजे’, असे सूचक वक्तव्य करताना राज्यातील सत्तेत शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष समान वाटेकरी असायला हवेत, अशी अप्रत्यक्ष मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केली. #DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #Bjp #Shivsena53RdFoundationDay

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या राज्यात केंद्राचे पथक येणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

Corona Virus | पिंपरीत आणखी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह

swarit

किरण गोसावी पुरता अडकणार?

swarit