HW News Marathi
महाराष्ट्र

तळीये मधल्या मृतांची संख्या ८४, शोधमोहीम थांबलं

तळीये | महाडच्या तळीये गावात २३ जुलैला दरड कोसळून स्थानिक नागरिकांच्या घरांवर कोसळली. NDRFची टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी ढिगाऱ्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली. आज (२६ जुलै) तब्बल २ दिवसां नंतर ही शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. दर्दी खाली अडकलेल्या मृतांची संख्या ८४ वर पोहोचली आहे.

अनेकांनी आपला जीव गमावला

तळीये गावाचं एका दिवसात होत्याचं न्हवतं झालेलं पाहायला मिळालं आहे. बेपत्ता ३१ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. रविवारपर्यंत इथे ढिगार्याजतून ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र सोमवारी चौथ्या दिवशी बचावकार्य थांबविण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या ३१ जणांना मृत घोषित करण्यात आलं असुन तळीये दुर्घटनेतील मृतांचा संख्या आता ८४ झाली आहे. या घटनेनंतर ढिगाऱ्याखालून केवळ ५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आह, हे ५ जण जखमी अवस्थेत सापडले आहेत.

नेमकं काय घडलं?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

जबाबदारी म्हाडाने स्विकारली

‘कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती’, असं ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकस्थळी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी

Aprna

अखेर निघाला मुहुर्त, महाविकास आघाडीचे नेते 1 सप्टेंबरला राज्यपालांना भेटणार!

News Desk

कंगना राणावत विरुद्ध पुण्यात तक्रार दाखल बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी

News Desk