HW News Marathi
महाराष्ट्र

झोपेत सरकार कसं आणायचं ते अजित पवारांना चांगलंच माहीत – चंद्रकांत पाटील

मुंबई | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीमुळे गेले २ दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपेत असतानाच पडेल, असे सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी चांगलाच समाचार घेतला. पाटील यांनी हे वक्तव्य स्वतः झोपेत असताना केलं की जागे असताना असा टोला पवार यांनी लगावला होता.

आता या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पलटवार करताना अजित पवारांना चांगलाच टोला हाणला आहे. झोपेत सरकार कसं आणायच ते अजित पवारांना माहीत आहे. आम्ही फाटके आहोत. अजितदादा जरा सांभाळून बोला. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवस सरकार स्थापन केलंत त्याचा तरी विचार करा असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

अजित पवारांना राष्ट्रवादीचे 28 आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत, ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले

अजित पवार यांना तलवारीचा धाक दाखवून कोणी शपथविधीसाठी नेले नव्हते. त्यामुळे आपण ज्या भाजपसोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे. तुम्हाला राष्ट्रवादीचे 28 आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तसेच, इंधन दरवाढीवरुन त्यांनी महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडताना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली. महाविकास आघाडी सरकारला जनतेच्या प्रश्नाची खोली कळत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अजित पवार यावर पलटवार करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपेत असतानाच पडेल, असे सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांनी हे वक्तव्य स्वतः झोपेत असताना केलं की जागे असताना असा टोला लगावला होता. लोकं झोपेत असताना महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, ज्या दिवसापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून पाटील यांना ते असह्य झाले आहे. आपल्या जागा अधिक असताना आपण सरकारमध्ये नाही याची बोचणी त्यांना लागली आहे. त्या मानसिकतेतून ते अद्याप बाहेरच येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे जाऊ नये. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी, आमचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे जोवर हा निर्णय कायम आहे, तोवर सरकारला कोणताही धोका नाही, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून दादागिरी खपवून घेणार नाही”, प्रवीण दरेकरांचा इशारा!

News Desk

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी सदाभाऊ खोतांनी घेतली भेट

Aprna

तुम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला असता तर सुप्रिया सुळेंनाही घरी पाठवले असते !

News Desk