HW News Marathi
महाराष्ट्र

गणेशोत्सवानंतर मुंबईत ‘विघ्न’? कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका!

मुंबई। मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता मुंबई महापालिकेनं व्यक्त केली आहे. तसेच या महिन्यातील आकडेवारीही तेच दर्शवतेय. मुंबईत ऑगस्ट महिन्यात दररोज 200 ते 300 कोरोना रुग्णांची नोंद केली जात होती. पण सप्टेंबर महिन्यात हाच आकडा 350 ते 400 पर्यंत पोहोचला आहे. अशातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून कोरोना नियमांचं पालन होत नसल्याचं महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः आरतीच्या वेळी अनेक नागरिक एकत्र येतात आणि मास्कशिवाय आरतीसाठी सहभागी होत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढणार असल्याचं, महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता

गेल्या वर्षी याच महिन्यातील चित्र मुंबईसाठी अत्यंत भयावह होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. अशातच दुसऱ्या लाटेदरम्यान, मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या ही गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाच्या नंतरच्या काळात पाहायला मिळाली होती. त्यामुळं यंदाच्या गणेशोत्सवावर मुंबई महापालिका बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आकडेवारीवर नजर टाकली, तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 400 ते 450 रुग्ण दररोज सापडत होते. आता गेल्या काही दिवसांपासून ही रुग्णसंख्या जवळपास 350 ते 360 रुग्णांवर आली आहे. पण गणेशोत्सवाच्या काळात वाढलेली गर्दी आणि कोरोना नियमांचं उल्लंघन यांमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

अशातच विसर्जन मिरवणूकींचं काय करायचं?

मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि दुसरं म्हणजे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये वाढणारी गर्दी. याठिकाणी नियमांचं पालन होतंय का? याकडे पालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. तरि नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन वारंवार प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. अशातच विसर्जन मिरवणूकींचं काय करायचं? हा प्रश्न सध्या महापालिकेसमोर आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा आकडा वाढू नये आणि तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू नये, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध दरवाढीच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत आक्रमक, ‘चाबूक फोड’ आंदोलनाची घोषणा

News Desk

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मनसेकडून हनुमान चालीसा आणि महाआरतीचे आयोजन, बाळा नांदगावकरांची माहिती

Aprna

दोन्ही समाजाने शांतता राखावीः शरद पवार यांचे निवदेन

News Desk