HW News Marathi
Uncategorized

‘संजय राऊत विरुद्ध नितेश राणे युद्धाला पुन्हा सुरुवात!’

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातल्या वादाला पुन्हा सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या सामना अग्रलेखावर भाजप पक्ष कायम टीका करत आला आहे. संजय राऊत हे देखील सामना अग्रलेखातून विरोधी पक्षावर साडेत्तोड टीका करत असतात. याच सामना अग्रलेखावरून आता संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांवर टीका केली आहे. ‘आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा मॉडेलवर बोला’, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला आहे.

काय आहे ट्विट?

“गुजरात मॉडेल च सोडा..तुम्ही ऐन कोरोना काळात मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले ते सांगा..

तुमचे ते मुंबई मॉडेल चे काय चाटायचे आम्ही ??? स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे ते आधी बघा..”, असं ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून विचारला आहे. कुठं काय बदलायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

40 हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट

गुजरातमध्ये बेरोजगारीचा भस्मासुर नाचतो आहे. अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. अहमदाबादजवळच्या ‘फोर्ड’ गाड्या बनवणाऱ्या कंपनीने गाशा गुंडाळला व 40 हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. संपूर्ण गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आक्रोश करीत आहेत व निवडणुकांत या संतापाचा फटका बसेल ही खात्री असल्यानेच मुख्यमंत्री रुपाणी यांना बदलून भूपेंद्र पटेल यांना नेमले. ही फक्त रंगसफेदीच आहे. भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन पटेल यांचे समर्थक आहेत. रूपाणी यांच्यामागे अमित शहा होते. त्यामुळे गुजरातमधील उद्याचे राजकारण जितके गोंधळाचे तितकेच रोचक असेल.

रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?

भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले. दिल्लीहून नाव आले व ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केले. नेता निवडीसाठी आमदारांनी मतदान केले असते तर दुसऱ्याच एखाद्या नावावर पसंतीची मोहोर उठली असती. काँग्रेस पक्षातही हे असेच घडते व यालाच आपल्याकडे लोकशाही म्हणावे लागते. लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive: आम्ही झेंड्यावर राजमुद्रा घेणार, मनसे भाजपसोबत जाणार नाही !

swarit

पालघरमधील निवडणुकीतील गोंधळा विरोधात जनहित याचिका दाखल

News Desk

जालना येथे सैन्य भरती

News Desk