HW News Marathi
महाराष्ट्र

वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे आहेत ! फडणवीसांचा बोचरा टोला

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ते मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे यंदाचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोठ्या प्रमाणात गाजले. या अधिवेशनाचा चा आज (१० मार्च) अखेरचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची आणि विरोधी पक्षाची पत्रकार परिषद झाली. यावेळी, सचिन वाझेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्वरित प्रत्युत्तर दिले. “सचिन वाझे हे लादेन नाहीत हे आम्हालाही माहीत आहे. पण तुमचे निर्णय तुघलकी आहेत”, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “आता सचिन वाझेंना वकिलाची आवश्यकता नाही. कारण त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत”, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे प्रकरणी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला होता. “वाझे ओसामा बिन लादेन असल्यासारखे चित्र विरोधक कशासाठी तयार करत आहेत?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच सवालाला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्याचप्रमाणे, “सचिन वाझेंकडे असे काय पुरावे आहेत की ज्यामुळे त्यांच्यावर सरकारकडून कोणतीच कारवाई होत नाही?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा उल्लेख “बिचारे” असा केला आहे.

सचिन वाझेप्रकरणी सरकारला कोंडीत पकडताना संजय राठोड यांचा उल्लेख “बिचारे” असा करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बिचारे संजय राठोड हे मंत्री असूनही त्यांचा राजीनामा घेतला. पण एपीआय वाझेंचा राजीनामा घेतला जात नाही. ह्याचं कारण म्हणजे राठोड हे सरकार हलवू शकत नाही. पाडू शकत नाही. पण वाझेंकडे निश्चितच असं काही आहे की ज्यामुळे ते सरकार हलवूही शकतात आणि पाडूही शकतात. त्यामुळे वाझेंना अटक केली जात नाही”, असे फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मसाला किंग’ MDH मसाल्याचे चेअरमन महाशय धरमपाल गुलाटी यांचे निधन

News Desk

राहुल गांधीसोबतच्या युपी पोलिसांच्या वागणुकीनंतर शरद पवारांचा संताप !

News Desk

मुंबईच्या लोकांनी गावी येऊ नये, नीतेश राणेंचा मुंबईकरांना सल्ला

swarit