HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय, सावधगिरी बाळगणे महत्वाचे – राजेश टोपे

औरंगाबाद | राज्यात दररोज ५०० ते ६००ने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काही ठराविक ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. खासकरून विदर्भ, मुंबईत रुग्ण वाढताय, त्यामुळं नियम पाळावे लागतील, ट्रॅकिंग करणे, ट्रेसिंग करणे आणि ट्रीटमेंट करने पाळावे लागेल. केंद्रीय कमिटीच्या सूचना आम्ही पाळतोय, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे अशा सूचना केल्या आहेत, त्याचीही अंमलबजावणी सुरू केली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरूं केला आहे. दुसरा डोस आजपासून देतोय, कॉविन अॅपमध्ये कुठलाही दोष नाही, ज्यांनी मॅन्युअल पद्धतीने एन्ट्री केल्या होत्या त्यांना त्याच पद्धतीने पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. यंत्रणेत दोष नाही, असा खुलासा टोपे यांनी केलाय.

जे अधिकारी ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये लक्ष देत नाही, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. सध्या नियम पाळले जात नाहीये हे स्पष्ट दिसतंय. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले. मात्र, नियम पाळावे लागतील, जर नाही पाळले तर पाश्चिमात्य देशात लॉकडाउन सुरू झालाय, त्यामुळं लॉकडाउन आपल्यालाही करावं लागेल. मात्र, हे टाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, लोकल आताच सुरू केली आहे, आपण लक्ष ठेवून आहोत, टोकाचा निर्णय घ्यायची वेळ अजून तरी आली नसल्याचे टोपे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज कोरोनाचे ३३९० नवीन रुग्णांची नोंद, तर १६३२ रुग्णांना घरी सोडले

News Desk

जळगावात कोविड रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी, रुग्णांचे झाले प्रचंड हाल

News Desk

महाराष्ट्रात Corona Vaccinationसाठी ‘केरळ पॅटर्न’ वापरा, शिवसेना नेत्याचं उद्धव ठाकरेंना पत्र

News Desk