HW News Marathi
महाराष्ट्र

“आबा आपल्याला लवकर सोडून गेले…”,आबांच्या आठवणीत अजित पवार झाले हळवे  

पुणे | राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आठवण पक्षातील सहकाऱ्यांकडून नेहमीच काढली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यात आबांची आठवण झाली. निमित्त होतं ते आबांचे सख्खे बंधू राजाराम पाटील यांच्या सत्काराचं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आबांबद्दल गहिवरुन आठवण काढत भाष्य केलं

आर. आर. आबा यांचे बंधू राजाराम पाटील यांची पिंपरी पोलिस आयुक्तालयातून कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते राजाराम पाटलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशही उपस्थित होते. सत्कारानंतर भाषण करताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांची आठवण काढली. आबा आपल्याला लवकर सोडून गेले, असं म्हणताना अजितदादा काहीसे गहिवरले.

“भाऊ गृहमंत्री असूनही राजाराम पाटील यांनी त्याचं कधीच भांडवल केलं नाही. नाही तर काही जणांचा लांबचा पाहुणा गृहमंत्री असला, तरी तो पोलिस आयुक्तालय चालवतो, मात्र राजाराम पाटील यांनी कधीच गैरफायदा घेतला नाही” अशा शब्दात अजित पवारांनी राजाराम पाटील यांचे कौतुक केले.

सहाय्यक पोलिस आयुक्तपदी सेवा बजावताना राजाराम पाटील यांना 15 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले होते. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पदक, पोलिस शौर्य पदक, उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहीर करण्यात येतात. राजाराम रामराव पाटील जवळपास दोन वर्षांपासून सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल,कटू निर्णय घ्यावे लागतील, मुख्यमंत्र्यांचा भिलवडी वाशियांना दिलासा

News Desk

राज्यात लवकरच दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

News Desk

संतापजनक! रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून अंबाजोगाईत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

News Desk