HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज आहे, त्यामुळे ते असे निराधार आरोप करतायत, राष्ट्रवादीचा मनसेवर पलटवार

अकोला | राज्यात वीज बिलवाढीसंदर्भात वातावरण तापलेलं असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांच्यावर आरोप केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर आता निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी प्रसिद्धीची नितांत गरज आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील म्हणाले की, सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे, त्यामुळे ते अशाप्रकारचे निराधार आरोप करत आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल (७ फेब्रुवारी) अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील जलसंपदा विभागाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.

यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा देखील घेतला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना कोरोना काळात दिलेल्या आश्वासनापासून देखील घूमजाव केला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याने ते अशाप्रकारे निराधार वक्तव्य करीत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

काय म्हणाले जयंत पाटील?

“वीज बिलवाढीसंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे. यावर शरद पवारांच्या घरी अदानी आले आणि विजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणं म्हणजे हास्यास्पद आहे. सध्या राज ठाकरे यांनी प्रसिद्धीची नितांत गरज आहे. त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे”, अशी टीका राज ठाकरेंवर केली. तर इंधन दरवाढीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, “केंद्राने इंधन दरवाढ कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचे शहाणपण शिकवू नये”, असा टोलादेखील जयंत पाटलांनी भाजप नेत्यांना लगावला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा निशाणा साधत राज ठाकरे यांनी थेट शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. सुरुवातीला ऊर्जामंत्र्यांनी वीज दरात कपात करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी घुमजाव केले. या प्रश्नावर मी राज्यपालांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मला शरद पवार यांच्याशी बोलून घ्यायला सांगितले. त्यानुसार मी शरद पवार यांच्याशी बोललो. तेव्हा पवार यांनी मला वीज कंपन्यांना पत्र लिहून त्याची प्रत पाठवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पवार संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांशी बोलणार होते, पण पाच-सहा दिवसांत माझ्या कानावर बातमी आली की, अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. त्यांच्यात काय बोलणं झालं हे कळलं नसलं तरी सरकारने त्यानंतर कोणतंही वीजबिलमाफ केलं जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सरकारने घुमजाव का केले?, असा प्रश्न मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पत्रकारांनी विचारायला हवा, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजा प्रजेत गेला पाहिजे मात्र मुख्यमंत्री मी आणि माझं कुटुंब म्हणत घरी बसले आहेत- रावसाहेब दानवे

News Desk

“आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरते मागे!” – सदाभाऊ खोत

News Desk

पोलीस दलाच्या अत्याधुनिक कार्यपद्धतीमुळे जनमानसात पोलीसांप्रति विश्वासार्हता! – जयंत पाटील

Aprna