HW News Marathi
महाराष्ट्र

  “आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं”, अजित पवारांचा भाजपला उपहासात्मक टोला 

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर आज (२६ डिसेंबर) तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी उपहासात्मक टीका करताना काही नेते संपर्कात असल्याच्या दाव्यासंबंधी भाष्य करताना टोला लगावला आहे. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी त्यांनी भाष्य केलं आहे.

“भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचं मी म्हटलेलं नाही. काळजी घ्या तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली…सरकार येणार नाही, आपली कामं होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथं कामं होत नसतील ते परत दुसरीकडे जातील एवढंच म्हटलं. तीन चार महिन्यात काही गोष्ट घडू शकतात असं म्हटलं तर त्यांना राग आला. त्यांनी इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं…आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं आहे,” असा चिमटा त्यांनी काढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यस्तरावरुन अधिकचा निधी उपलब्ध करुन घेण्यास पाठपुरावा करणार! – सतेज पाटील

Aprna

समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, सामनातून काँग्रेसवर बोचरी टीका

News Desk

भाजप लाचार नाही, ‘होय’ युती आम्हाला हवी आहे !

News Desk