HW News Marathi
महाराष्ट्र

जर विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात नक्की यश येईल – छगन भुजबळ

नाशिक | भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी ताकदीने एकत्र आलं पाहिजे त्याशिवाय भाजपचा वारु रोखणार नाही, अशी रोखठोक भूमिका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली होती. त्यांच्या याच मताशी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सहमती दाखवली आहे. “संजय राऊतांनी लिहिलेला अग्रलेख खरोखर उद्वेगामुळे आला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपविरोधी पक्ष जर एकमताने यूपीएच्या पंखाखाली आले तर भाजपला रोखणे शक्य आहे”, असं मत यावेळी छगन भुजबळ यांनी मांडलं आहे.

“यूपीए आणि आणखी काही घटक पक्ष एकत्र आले तर निश्चित देशातली परिस्थिती बदलू शकते. भाजपचा वारु जर रोखायचा असेल तर भाजपविरोधी सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं. जर हे पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात नक्की यश येईल”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

“संजय राऊतांनी आज ज्या मुद्द्यावर अग्रलेख लिहिला तो मुद्दा बरोबर आहे. राजकीयदृष्ट्या भाजपला जर प्रबळ आव्हान द्यायचं असेल तर विविध राज्यातील प्रमुख भाजपविरोधी पक्षांनी यूपीएमध्ये सामिल होऊन भाजपविरोधातली लढाई अधिक तीव्र करायला हवी”, असं छगन भुजबळ म्हणाले.

तसेच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पाठवलेल्या ईडीच्या नोटीसवरुनही भुजबळांनी भाष्य केले आहे. खडसेंना ईडीची नोटीस येणारच होती, असं म्हणत त्यांनी भाजपवर याप्रकरणी निशाणा साधला आहे. विरोधकांना दाबण्यासाठी भाजप अश्या प्रकारचं हीन राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

तर काल (२५ डिसेंबर) पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मी लवकरच कोल्हापूरला परत जाईन, असं म्हटलं. त्यावर बोलताना भुजबळांनी चंद्रकांत पाटलांना टोमणा लगावला आहे. “चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरला जायचं की आणखी कुठे या त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कुठेही जावं”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वर्षभर ३ पक्ष एकत्र विटी दांडू खेळत होते का”, भाजपचा परखड सवाल

News Desk

माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाण यांचा खळबळजनक खुलासा

swarit

राज्यपाल-उद्धव ठाकरे ,अजित पवार भेटीत नेमकं काय घडलं ? १२ आमदारांबद्दल राज्यपाल काय म्हणाले ?

News Desk