HW News Marathi
महाराष्ट्र

दानवे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे माहित असेल, मुनगंटीवारांनी केली दानवेंची पाठराखण

मुंबई | “शेतकऱ्यांच्या आंदोलनात कोणत्या परकीय शक्तींचा हात आहे. याबद्दल त्यांना माहीत असेल. कारण रावसाहेब दावने हे केंद्रीय मंत्री आहेत,” असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रावसाहेब दानवे यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे. दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे नाही. तर या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तृळातून दानवेंवर टीका सुरु झाल्या. मात्र, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र दानवेंची पाठराखण केली आहे.

“दानवे यांच्या वक्तव्याशी सहमत किंवा असहमत असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सध्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे कोणत्या परकीय शक्तींचा हात आहे, याची त्यांना माहिती असेल, कारण दानवे केंद्रीय मंत्री आहेत,” असे मुनगंटीवार म्हणाले. तसेच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातसुद्धा अनेकदा परकीय शक्तींचा हात असल्याचं बोललं जायचं, अशी पुष्टीही त्यांनी दानवे यांच्या समर्थनार्थ जोडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

परळीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा एल्गार!

News Desk

केंद्राच्या कृषी कायद्याबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार

News Desk