HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार येणार आणि ५ वर्ष चालणार!

नागपूर | कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार येणार आणि ५ वर्ष चालणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. पवार पुढे म्हणाले की, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे. किमान समान कार्यक्रम या मुद्द्यावर हे तीन पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होत आहे. लवकर सरकार स्थापन होईल, आम्हाला राज्यपालांनी ६ महिन्याचा अवधी दिला आहे, असा टोलाही पवारांनी भाजपला लगावला.

तसेच राज्यात सरकार स्थापन होण्यास चर्चा सुरू असून सकारात्मक संकेत पवारांनी आज (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना या मुद्द्यावर आम्ही कायम राहू. मुस्लिम आरक्षणासंदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये चर्चा करू. सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही. परंतु मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न असेल, असे देखील पवारांनी यावेळी सांगितेल.

बैठकांना उपस्थित नसल्यामुळे मला तपशीलवार माहिती नाही

राष्ट्रवादीच्या नेत्यांची काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा झाली. मी त्या बैठकांना उपस्थित नसल्यामुळे मला तपशीलवार माहिती नाही. किमान सामायिक धोरणावर चर्चा सुरू आहे. सर्वमान्यता झाल्यानंतरच आराखडा करण्यात येईल, असे पवारांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल दिल्लीहून आले होते. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. दोन-तीन दिवसांनी पुन्हा दिल्लीला बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले, असेही पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परब शिवसेनेचे कलेक्टर, ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन नारायण राणेंची टीका

News Desk

“कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…”अमृता फडणवीसांचे नवे गाणे येणार भेटीला

News Desk

३०० कोटींचा मालक ५-६ कोटींसाठी आत्महत्या करतो? हे पटण्यासारंखं नाही – निलेश राणे

News Desk