HW News Marathi
महाराष्ट्र

वर्षपूर्तीच्या आनंद संपायच्या आत काँग्रेसचे इशारे सुरू, भाजपचा टोला

मुंबई । काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधत इशारा दिला आहे. “सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं”, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

त्यानंतर आता महाविकासआघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस पुन्हा दिसून आली आहे.यावर भाजपने जोरदार टोला लगावला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे की, “राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद अजून संपायच्याआत काँग्रेस नेत्यांचे इशारे सुरू झाले,त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

यशोमती ठाकूर यांनी काय इशारा दिला होता ?

यशोमती ठाकूर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.” पुढे यशोमती ठाकूर असेही म्हणाल्या कि, “काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!; ‘म्हाडा’च्या परीक्षा रद्द झाल्याने फडणवीसांचा संताप

News Desk

विरोधीपक्षाचे 19 आमदार निलंबित

News Desk

नर्मदा नदीच्या पात्रात बोट उलटून ६ जणांचा मृत्यू

News Desk