HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार कोणत्याच बाबतीत गंभीर नाही…प्रीतम मुंडेंचा सरकारवर आरोप

बीड | बीड येथे भाजपच्या वतीने आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले,त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की,हाथरास प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या राज्यातील सरकारला महाराष्ट्रात महिलांवर होत असलेले अत्याचार दिसतं नाहीत.निधी नाही हे एकच पालुपद सरकारकडून सुरू आहे .

माझा मुलगा आज ट्युशनला जाऊ शकला नाही,त्याच्या ट्युशनला सुट्टी मिळाली अन मुंबईमधील वीज गेल्याची बातमी मला कळाली असे म्हणत बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले. सरकार कोणत्याच बाबतीत गंभीर नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत .महिला अत्याचार असोत की इतर प्रश्न राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

मुंबईमधील वीज पुरवठा अर्धा दिवस झाला तरी सुरळीत झालेला नाही हे सरकारचे अपयश आहे असं सांगत त्यांनी माझ्या मुलाची ट्युशन बुडाली त्यामुळे वीज गायब झाली आहे ही बातमी मला कळली असे सांगत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाच काय रात्री सुद्धा वीज मिळत नाही,आज शहरात वीज गेली तर सरकारला कळलं,मात्र अशी अचानक वीज गेल्यावर दुसरी पर्यायी यंत्रणा सरकारकडे नसणे हे मोठे अपयश असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौरी सावंत यांच्या तृतीयपंथी मातृत्वाची उलगडली कथा !

News Desk

जाणून घ्या… गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व आणि मुहूर्त

News Desk

मुंबईत बॉम्बस्फोट कट प्रकरणी एटीएसकडून आणखी एकाला अटक!

News Desk