HW News Marathi
महाराष्ट्र

‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था 

सातारा | मराठा आरक्षण मुद्दा सध्या गंभीर होत चालला आहे. आरक्षणाची योग्य दिशा ठरविण्यासाठी आणि मराठ्यांची एकी वाढवण्यासाठी ३ ऑक्टोबरला पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या बैठकीचे निमंत्रण छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना दिले आहे. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने घेण्याचं काम हे सरकार करत नाही. मराठा समाजामध्येही एकी दिसून येत नाही. त्यामुळे येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यात संपूर्ण राज्यातील मराठा समाजातील प्रमुख मंडळी एकत्र आणण्याचे काम केलं जाणार आहे.

“ओबीसी आणि मराठा समाजात काही नेते मंडळी तेढ निर्माण होतील असे वक्तव्य करत आहेत. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हेच पुढाकार घेत आहेत.वडेट्टीवारांसारखी मंडळी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचे काम करत असल्याचा आरोप मेटे यांनी केला. ‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था आहे, असेही विनायक मेटे म्हणाले.”

“ओबीसी आणि मराठा समाजात काही नेते मंडळी तेढ निर्माण होतील असे वक्तव्य करत आहेत. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हेच पुढाकार घेत आहेत. वडेट्टीवारांसारखी मंडळी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचे काम करत असल्याचा आरोप मेटे यांनी केला. ‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था आहे, असेही विनायक मेटे म्हणाले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? सेना- काँग्रेसमध्ये नामंतरावरून वाद 

News Desk

राज्यतले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले, तर देशमुख जाण्याच्या तयारीत’, अतुल भातखळकरांची टीका!

News Desk

“आता त्यांना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’च म्हणत बसावे लागेल”, खडसेंचा टोला

News Desk