HW News Marathi
मुंबई

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

नवी मुंबई | राज्यभरातून पोलीस भरतीसाठी मुंबईत येणा-या ग्रामीण भागातील तरुणांचे नेहमीच हाल होतात. यावर अनेकदा बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आरोप प्रत्यारोप होतात मात्र कोणीही या तरुणांची मदत करताना दिसून येत नाही. मात्र यावेळी नवी मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्याच्या व्यवस्था करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तरुणांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पहायला मिळत आहे.

नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते गजानन काळे यांनी या पोलीस भरतीसाठी आलेल्या सुमारे ४०० ते ५०० मुला-मुलींची रहाण्याची व जेवण्याची व्यवस्था केल्यामुळे नवी मुंबई ग्रामीण बेरोजगार तरुणांसाठी मनसे धावून आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागातून भरतीसाठी आलेल्या तरुणांना नेहमीच रात्रीच्या वेळी पदपथावर झोपावे लागते. दरवर्षीच्या या समस्यांवर तोडगा काढत मनसे कार्यकर्त्यांनी केलेली ही व्यवस्था सध्या नवी मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Breaking News | वरळीतील साधना मिल कम्पाउंडला भीषण आग

News Desk

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

News Desk

आयएनएस करंजचं जलावतरण

swarit
महाराष्ट्र

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

Gauri Tilekar

पुणे | पुण्यातील मुस्लिम समाजाकडून रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम समाजाला दिले गेलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे या मुख्य मागणीसाठी गोळीबार मैदान ते विधानभवनापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या मूक मोर्चात नियोजनासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवक तैनात आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मुस्लिम समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे.

 

मुस्लिम समाजाव्यतिरिक्त इतर अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्तेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण कायम करावे त्याचप्रमाणे गोरक्षा, लव्ह जिहाद यासारख्या मुद्द्यांमुळे केवळ संशयावरून विनाकारण अनेक मुस्लिमांची मॉब लिंचिंगद्वारे झालेल्या हत्या या विरोधातही या मूक मोर्चात अनेक फलक दिसत आहेत. दलित व मुस्लिमांवरील जातीय, धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात तसेच मुस्लिम समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे या मागण्यादेखील या मोर्चामार्फत केल्या जात आहेत.

 

 

 

 

Related posts

‘परमबीर सिंह यांची हायकोर्टात याचिका’, चांदिवाल आयोगाची गरच काय!

News Desk

राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त १५८ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

भोकर, बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ” संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार “

News Desk