HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकमध्ये निवडणुकांचे बिगूल वाजले!

बेंगळुरू | कर्नाटक राज्याच्या विधानसभेसाठी मतदानाची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण कर्नाटक विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

  • असा असेल निवडणूक कार्यक्रम

17 एप्रिल – अधिसूचना जारी

24 एप्रिल – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

25 एप्रिल – उमेदवारी अर्जांची छाननी

27 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख

12 मे – मतदान

15 मे – मतमोजणी

दरम्यान, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपचे आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीटरवर तारखा जाहीर केल्या. त्यासंदर्भात काही माध्यमांनी बातम्याही दिल्या. मालवीय यांचे ट्वीटही लगेच व्हायरल झाले. मात्र त्यांच्या अकाऊंटवर पाहिले असता हे ट्वीट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाने याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

विधानसभेच्या 224 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. सिद्धरमैय्या मुख्यमंत्री आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पार्थ पवारांचं नाव घेत पडळकरांचा अजित पवारांवर घणाघात

News Desk

केदारनाथमध्ये औरंगाबादच्या भाविकांचा अपघात, दोन ठार 33 जखमी

News Desk

अमेरिकेने रोखली पाकिस्तानची रसद

News Desk
महाराष्ट्र

न्यायमूर्ती लोयाची चौकशी का थांबवतायत | पृथ्वीराज चव्हाण

News Desk

सोहराबूद्दीन इनकाऊन्टर प्रकरणात न्यायधीश म्हणून काम करणाऱ्या न्यायधीश लोया यांच्या हत्येचा प्रकरणाची चौकशी होऊ नये यासाठी राज्य सरकार हरीष सावळे सारखे महागडे वकील लावत आहेत.

चौकशी होऊ न देण्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा काय इंटरेस्ट आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर काय भूमिका आहे याची माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून लोकांचा कायद्यावर विश्वार राहिला आहे की नाही असे वातावरण तयार झाले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केला.

Related posts

बोगस मतदानाची शक्यता ?

News Desk

शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

News Desk

…तर अजित पवार म्हणाले, आणि रोहित पवारांनी देखील केंद्राकडून केली मदतीची अपेक्षा!

News Desk