HW News Marathi
महाराष्ट्र

अण्णा हजारेंचा मोदी सरकाराला अखेरचा इशारा

नगर | लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी वारंवार विनंती करूनही जागा उपलब्ध न करून दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना शेवटचा इशारा दिला आहे.

मला आंदोलनासाठी दिल्लीत जागा न उपलब्ध करून दिल्यास नाईलाजाने तुरुंगात आंदोलन करावे लागेल, असे अण्णांनी म्हटले आहे. अण्णा हजारे येत्या 23 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. आंदोलनाच्या जागेसाठी ७ नोव्हेंबर २०१७ पासून हजारे यांनी आतापर्यंत बारा वेळा पत्रे मोदींना पाठवली आहेत.

मात्र, यापैकी एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य पंतप्रधान मोदींनी दाखविलेले नाही. त्यामुळे अण्णांनी पंतप्रधान मोदींना अखेरचे पत्र पाठवून अंतिम इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनकडून दत्तक घेऊन सुद्धा झाला नाही

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हातात स्टेअरिंग आहे असं म्हणू द्या, पण अजितदादांनी ट्विट करुन सगळं सांगितलं – विनायक मेटे

News Desk

‘चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर आता संजय राऊत म्हणाले….’

News Desk
मुंबई

हार्दिक पटेलवर शाई फेक

News Desk

मुंबई | मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये हार्दिक पटेल यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मिलिंद गुर्जर या युवकाने हार्दिक पटेलवर शाईफेक केली.

उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल पत्रकार परिषद घेत असताना ही घटना घडली. असून प्रकारानंतर हार्दिक पटेलच्या समर्थकांनी गुर्जरला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी मिलिंद गुर्जरला अटक केली आहे.

स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला.

हार्दिक पटेल सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शनिवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने व्यापमं घोटाळ्यावरुन शिवराजसिंग चौहान सरकारवर निशाणा साधला होता.

Related posts

अंधेरी पश्चिम परिसरातील ११ उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामे तोडली

swarit

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna

ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ नाही, सर्वसामान्यांना दिलासा

News Desk