HW News Marathi
मुंबई

ऐरोलीमध्ये दुकानाला आग, आई-मुलीचा गुदमरुन मृत्यू

नवी मुंबई – ऐरोली सेक्टरमध्ये नॉव्हेल्टी स्टोअरला आग लागल्यामुळे आगीत मंजू चौधरी (२५) आणि मुलगी गायत्री चौधरी (५) या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ही आग गुरुवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास दुकानात शॉर्ट सर्किटमुळे भीषण ही आग लागली.

या दुकानात खेळण्याचे साहित्य आणि प्लास्टिकचे सामान असल्यामुळे लवकर आग पकडली. त्यामुळे दुकानात सर्वत्र धुर पसरला असून दुकानाच्यावर राहणाऱ्या मंजू चौधरी आणि मुलगी गायत्री चौधरी याच गुदमरुन मृत्यू झाला. आग लागल्याचे कळताच मंजूच्या पतीने २ वर्षाच्या मुलीला घेऊन घराबाहेर आला. पत्नी आणि मुलीला घराबाहेर काढण्यासाठी पुन्हा घराच्या दिशेने त्यांनी धाव घेतली. पण, आगीमुळे दोघींनाही बाहेर काढण्यात अपयश आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दादर रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती

News Desk

पुणे जिल्ह्यातील नवीन विमानतळासाठी आवश्यक परवानग्यांचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार- मदन येरावार

News Desk

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

News Desk
राजकारण

जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचा राजीनामा

News Desk

श्रीनगर | भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला आहे. मेहबुबा यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपुर्द केला असून सायंकाळी चार वाजता पीडीपीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पीडीपीचे प्रवक्ते रफी अहमद मीर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपसोबत मिळून आम्ही योग्य प्रकारे सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. भाजप सत्तेतून बाहेर पडत आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. याबाबत आम्हाला कोणतेही संकेत देण्यात आले नसल्याचे ते यावेळी बोलताना म्हणालेत.

Related posts

ज्यांनी ५ वर्षे राज्याचं गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवच – हसन मुश्रीफ

swarit

शरद पवार हे जाणता राजा आहेत, यात चुक काय?” छगन भुजबळांचे वक्तव्य

Aprna

उपेंद्र कुशवाह यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

News Desk