HW News Marathi
राजकारण

लालु प्रसाद यादव यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता नाही, आणखी एका प्रकरणात दोषी

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालु प्रसाद यादव यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता नाही. चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात ते दोषी आढळून आले आहेत. चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले.

शिक्षेची सुनावणी न्यायालयाने केलेली नाही. चारा घोटाळ्यातील हे तिसरे प्रकरण आहे. याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. चाईबासा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी तर सहा जणांना निर्दोष ठरवण्यात आले. ९५० कोटींच्या चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागारमधून ३५ कोटी ६२ लाख रूपये काढण्यात आले होते. चाईबासा कोषागारप्रकरणी १२ डिसेंबर २००१ मध्ये ७६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निवडणुकांच्या काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

News Desk

घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित नाही, मी आहे त्या घरात सध्या तरी खुश – वैभव पिचड

swarit

‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जाणून घेणार लोकांचा कौल

News Desk
मुंबई

शिवाजी पार्कवर रंगला महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा

News Desk

मुंबई : सालाबादाप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजवंदन, संचलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते,औद्योगिकमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर उपस्थित होते आदि मान्यवर उपस्थित होते.

मंगळवार १ मे रोजी ५८ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दादर मधील शिवाजी पार्क मैदानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एस टी महामंडळातर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने अंतर्गत शहिदांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहिदांच्या 5 वीर पत्नींना एसटी चा मोफत आजीवन पास देण्यात आला.

 

Related posts

कुर्ला स्थानकात पाणी साचले, मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने

News Desk

भारतात प्रथमच दहा शहरांत ई-स्पोर्ट स्पर्धा होणार

swarit

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

News Desk