HW News Marathi
महाराष्ट्र

निराधार व्यक्तींना दर महिना किमान २,००० रुपयांचा भत्ता द्या !

नवी दिल्ली | “केंद्र सरकारकडून देशातील निराधार आणि गरजू व्यक्तींना ‘श्रावण बाळ निराधार योजने’अंतर्गत दर महिना २०० रुपये तर राज्य सरकारकडून दर महिना ४०० रुपये भत्ता मिळतो. मात्र, देशातील सध्याची महागाई पाहता महिना ६०० रुपयांमध्ये या गरजू व्यक्तींचा रोजचा खर्च कसा भागणार ? केंद्राने या व्यक्तींना दर महिना किमान २,००० रुपयांचा भत्ता द्यावा”, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केली आहे.

“आपण आज नुसता चहा जरी प्यायला गेलो तरी २० रुपये लागतात. मग, या निराधारांनी ६०० रुपयांत संपूर्ण महिन्याचा खर्च कसा भागवायचा ? असा प्रश्न देखील नवनीत कौर राणा यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे,”देशातील सद्यस्थितीतील महागाई लक्षात घेता या निराधार, अंध-अपंग, बेरोजगारांना केंद्र सरकारने किमान 2 हजार रुपये महिना भत्ता द्यावा”, अशी मागणी नवनीत कौर राणा यांनी केंद्राकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि लस महत्त्वाची भूमिका बजावेल! – अजित पवार

Aprna

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका!

News Desk

शरद पवारांवर राजकीय वर्तुळातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव!

News Desk