HW News Marathi
महाराष्ट्र

सोनई हत्याप्रकरणी ६ जण दोषी

नाशिक – सोनई हत्याप्रकाणी सात जणांपैकी ६ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्या सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अशोक रोहिदास फलके याला पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली आहे. अहमदनगर जिल्यातील नेवासा तालुक्यात सोनई येथे २०१३मध्ये प्रेमप्रकरणातून तीन युवकांची हत्या करण्यात आली होती. दोषींवर १८ जानेवारी सुनावणी होणार आहे. सचिन सोहनलाल घारु (२३), संदीप राज धनवार (२४) आणि राहुल कंडारे (२६) या तीन युवकांची हत्या झाली होती.

संपूर्ण प्रकरण

सचिन घारु याने उच्च जातीच्या मुलीवर प्रेम केला होता तिच्यासोबत लग्न करणार होता. मुलीच्या कुटुंबाने सचिन घारु याची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तकडे कूपनलिकेत टाकले. सचिनचे दोन मित्र संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांची देखील हत्या करुन कोरड्या विहिरीत पुरले होते.

पोलिसांनी या हत्याप्रकरणी प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक फलके, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांना अटक करण्यात आले होते. तसेच सीआयडीने सात जणांवर विरोधात गुन्हा दाखल केला होता. न्यायलयाने सोनई हत्याप्रकरणी यापैकी सहाजणांना दोषी ठरविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अदार पुनावला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली ? नेमकं काय आहे सत्य ?

News Desk

उरणच्या खोपटा पुलावर दहशतवादी संघटनेच्या मजकूराने खळबळ

News Desk

जर सूडाचं राजकारण केलं जात असेल…

swarit