HW News Marathi
महाराष्ट्र

सोनई हत्याप्रकरणी ६ जण दोषी

नाशिक – सोनई हत्याप्रकाणी सात जणांपैकी ६ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्या सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अशोक रोहिदास फलके याला पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली आहे. अहमदनगर जिल्यातील नेवासा तालुक्यात सोनई येथे २०१३मध्ये प्रेमप्रकरणातून तीन युवकांची हत्या करण्यात आली होती. दोषींवर १८ जानेवारी सुनावणी होणार आहे. सचिन सोहनलाल घारु (२३), संदीप राज धनवार (२४) आणि राहुल कंडारे (२६) या तीन युवकांची हत्या झाली होती.

संपूर्ण प्रकरण

सचिन घारु याने उच्च जातीच्या मुलीवर प्रेम केला होता तिच्यासोबत लग्न करणार होता. मुलीच्या कुटुंबाने सचिन घारु याची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तकडे कूपनलिकेत टाकले. सचिनचे दोन मित्र संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांची देखील हत्या करुन कोरड्या विहिरीत पुरले होते.

पोलिसांनी या हत्याप्रकरणी प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक फलके, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांना अटक करण्यात आले होते. तसेच सीआयडीने सात जणांवर विरोधात गुन्हा दाखल केला होता. न्यायलयाने सोनई हत्याप्रकरणी यापैकी सहाजणांना दोषी ठरविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…तर इस्राईलच्या पंतप्रधानांसारखी वेळ मोदींवर येऊ शकते – सामना अग्रलेख

News Desk

मेडशी येथे निळ्या पाखरांचे महामानवाला अभिवादन

News Desk

आईला बाजारात पाठवून घेतला गळफास

News Desk
मुंबई

मोदीविरोधात लिखाण करणे महागात, पोलीस निलंबित

News Desk

मुंबई: देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, असे काहीसे उदाहरण घडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केले म्हणून एका पोलीसाला निलंबित करण्यात आले आहे. रमेश शिंदे असे या पोलिसाचे नाव असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहे. या कारवाईचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबवण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू असल्याचे हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी निलंबनाची कारवाई केली. शिंदे हे अनेक वर्षांपासून माजी मंत्री थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम करत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरुन मोदींविरोधातील लिखाणाचा मजकूर अनेक ग्रूपवर पाठवल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने याप्रकरणाची चौकशी केली. मोदीविरोधातील मेसेज शिंदे यांच्या मोबाईलवरुन व्हायरल झाल्याचं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ घोषणा

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

News Desk