HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांनी राज्यातील भीषण दुष्काळावर मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

मुंबई | राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळात जनता होरपळत असून यावर उपाययोजना करण्याबाबत आज (७ जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. बारामती तालुक्यात दुष्काळी असून गेले दोन दिवस या दुष्काळी भागाचा दौरा करत आणि तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याचे पवारांनी सांगितले. बारामतीसह राज्यात भीषण पाणीटंचाई व दुष्काळाचा सामना राज्यातील जनता करत आहे. या सगळ्या शेतकर्‍यांच्या समस्या आज मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. या बैठकीनंतर मिडियाशी बोलताना पवार यांनी बारामतीमध्ये सरकारी वैद्यकीयमहाविद्यालयाबाबत १०० जागांची पहिली बॅच ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. याबाबत बैठक पार पडली असे सांगितले.

दुष्काळाचे काही मुद्दे होते ते उपस्थित केले. जनावरांच्या छावण्या बंद करू नका, हिरवा चारा येत नाही तो पर्यंत टँकर पाणीपुरवठा कमी होत आहे. त्याबाबत सरकारने नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. बारामती पाण्याच्या संदर्भात ही बातम्या आल्या, परंतु आमची भूमिका ही आहे की, दुष्काळात असे वाद पुढे आणू नये, पाण्याची पळवापळवी झालेली नाही, कुणीही कुणाचे पाणी पळवले नाही, सध्या कुठल्याच धरणात पाणी नाही, ऑक्टोबरमध्ये नवीन सरकार येईल. त्यावेळीचा हा प्रश्न आहे, कालवा सल्लागार समिती बसते. त्यातून हे निर्णय होतात जे वाटप झालेय तसे पाणी मिळणार अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आणि विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे, इंदापुरचे आमदार दत्ता बारणे उपस्थित होते. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त जयंत पाटलांचं ‘हे’ गिफ्ट!

Jui Jadhav

अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये काम करूनही नशिबी काय आलं…पराभवचं!

News Desk

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे! – नितीन गडकरी

News Desk