HW News Marathi
क्राइम

चार वर्षानंतर तलवार दाम्पत जेलबाहेर

गाझियाबाद(वृत्तसंस्था): आरूषी आणि हेमराजच्या हत्येप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने निर्दोष ठरवल्यानंतर राजेश आणि नुपूर तलवार दाम्पत्याची आज कारागृहातून सुटका झाली. चार वर्षांनंतर हे दाम्पत्य कारागृहाबाहेर आले. कारागृहातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तलवार दाम्पत्य कारागृहाबाहेर पडले कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पत्रकार व छायाचित्रकारांची गर्दी झाली होती. मात्र,कोणतीही प्रतिक्रिया न देता हे दोघे निघून गेले.आरुषीचे वडील राजेश आणि आई नुपूर या दोघांची नोव्हेंबर २०१३मध्ये गाझियाबादमधील दासना कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने तलवार दाम्पत्याला २६ नोव्हेंबर २०१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान, तलवार दाम्पत्याने या शिक्षेला अलाहाबाद हायकोर्टात आव्हान दिले होते. १२ आॅक्टोबर रोजी या आव्हान याचिकेवर कोटार्ने निकाल दिला. तपासातील त्रुटी आणि सबळ पुराव्याअभावी हायकोर्टाने तलवार दाम्पत्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. आरुषीला तिच्या आईवडिलांनी मारले नाही, असे मतही कोर्टाने हा निकाल देताना नोंदवले. अशा प्रकरणात सुप्रीम कोर्टही इतकी कठोर शिक्षा देत नाही, असेही कोर्टाने यावेळी नमूद केले होते. दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज तलवार दाम्पत्याची दासना कारागृहातून मुक्तता करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

”हॉटेल ‘ललित’मध्ये अनेक गुपितं”

News Desk

मुलींची छेड करणाऱ्या क्‍लासच्या व्यवस्थापकाला चोप

News Desk

अनिल देशमुखाना मोठा दिलासा! जामीनाविरोधातील CBIची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna
मुंबई

मोदीविरोधात लिखाण करणे महागात, पोलीस निलंबित

News Desk

मुंबई: देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, असे काहीसे उदाहरण घडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केले म्हणून एका पोलीसाला निलंबित करण्यात आले आहे. रमेश शिंदे असे या पोलिसाचे नाव असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहे. या कारवाईचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबवण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू असल्याचे हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी निलंबनाची कारवाई केली. शिंदे हे अनेक वर्षांपासून माजी मंत्री थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम करत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरुन मोदींविरोधातील लिखाणाचा मजकूर अनेक ग्रूपवर पाठवल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने याप्रकरणाची चौकशी केली. मोदीविरोधातील मेसेज शिंदे यांच्या मोबाईलवरुन व्हायरल झाल्याचं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Related posts

परळमधील महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग

swarit

मुंबईतील अनेक हॉटेलमधे ग्राहकांची फसवणूक !

News Desk

पाईपलाईन फुटली , दोन मुलांचा मृत्यू

News Desk