HW News Marathi
क्राइम

मल्ल्याने कर्जाची रक्कम गुंतवली बोगस कंपन्यांत

नवी दिल्ली भारतीय बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज घेऊन फरार झालेल्या विजय मल्ल्याने हा पैसा बोगस कंपन्यांमध्ये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. मल्ल्याने एसबीआयच्या नेतृत्त्वाखालील बँक समूहाकडून ६ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. यातील बहुतांश पैसा माल्ल्याने बोगस कंपन्यांकडे वळवल्याची माहिती सीबीआय आणि ‘ईडी’च्या तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे आता सीबीआय आणि ईडीकडून मल्ल्याविरोधात नवे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

विजय मल्ल्याने एसबीआयकडून ६ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. यातील बहुतांश रक्कम त्याने जवळपास सात देशांमधील बोगस कंपन्यांमध्ये वळवली होती. याआधी माल्ल्याने आयडीबीआयकडून घेतलेल्या ९०० कोटींच्या कर्जाप्रकरणी त्याच्याविरोधात पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, आता तब्बल ६ हजार कोटींच्या कर्ज प्रकरणात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत या आरोपपत्रांची मोठी मदत भारताला होऊ शकते. मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सध्या खटला सुरु आहे.

‘एसबीआय’कडून घेतलेले ६ हजार कोटी रुपये बोगस कंपन्यांमध्ये गुंतवल्याप्रकरणी मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ‘बँकांनी किंगफिशर एअरलाईन्सला जे कर्ज दिले होते, तो पैसा मल्ल्या आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बोगस कंपन्यांमध्ये वळवला. याबद्दल अमेरिका,ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंडशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या देशांकडून लवकरच उत्तर मिळेल,’ असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पैशांच्या कथित अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी विजय मल्ल्याला भारतात येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एसबीआयच्या नेतृत्त्वाखाली जवळपास १२ हून अधिक बँकांनी २००५ ते २०१० या काळात मल्ल्याच्या किंगफिंशर एअरलाईन्सला हे कर्ज दिले होते. हे कर्ज आणि त्यावरील व्याजाचा विचार केल्यास ही रक्कम ९ हजार कोटींवर जाते. कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी मल्ल्याविरोधात मागील वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राजस्थानमध्ये मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी

News Desk

भरदिवसा स्कायवॉकवर चॉपरने हल्ला झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मूत्यू , चार जणांना अटक

News Desk

भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना उडविले

News Desk
महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार अरूण साधू कालवश

News Desk

मुंबईः ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि पत्रकार अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्रास वाढत गेल्याने काल सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेर आज पहाटे साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचे पार्थिव वांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एक मोठे नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे.

साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका,नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून लेखन केले. त्यांच्या‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली. ‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक,श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते

 

Related posts

तासाभरात कर्मचाऱ्यांना मिळणार २ महिन्यांचा पगार  आणि दिवाळी बोनस – अनिल परब

News Desk

उर्मिला मातोंडकर या शिवसैनिकच आहेत – संजय राऊत

News Desk

धुळ्यात जयंत पाटलांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा

News Desk