HW News Marathi
मनोरंजन

बीग बी अमिताभ यांच्याकडून मुंबई स्पीरिटचे कौतुक

मुंबई : ‘मुंबईतील सकाळची भयाण शांतता… आणि आता पुन्हा पाऊस सुरू झालाय… पण मुंबईकरांचं धैर्य काही औरच आहे…जय हिंद’, अशा शब्दांत बॉलिवूडचा सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन याने मुंबईकरांच्या स्पीरिटचे कौतुक केले आहे. काल दिवसभर थैमान घालणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक लोक ठिकठिकाणी अडकून पडले होते. या काळात मुंबईकरांनी मदतीसाठी पुढे येत एका वेगळ्याच धैर्याचे दर्शन घडविले. बीग बीनी ट्विटरवरून या धैर्याला सलाम केला आहे.

काल तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक कोलमडली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी भरल्यानं रस्ते वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. लोकांनी कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढत कसेबसे घर गाठले. पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यातच काही स्वयंसेवी संस्था, संघटना आणि मंडळांनी नाक्यानाक्यावर लोकांसाठी नाश्ता आणि चहापाण्याची व्यवस्था करून मानवतेचं दर्शन घडवलं. हे सर्व चित्र वृत्तवाहिन्यांवरून आणि सोशल मीडियावरून प्रसारीत होतं होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऋषी कपूर यांच्या निधनाने निखळ आनंद देणारे हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वे हरपले !

News Desk

शाहरुख खाननी महाराष्ट्रातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना अशी केली मदत

News Desk

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk