HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंचा पक्ष कोणता?

मुंबई- नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या गेल्या महिनाभरापासून उठत आहेत. परंतु त्यांचा अधिकृत प्रवेश काही केल्या होत नाही. नारायण राणे मनाने केव्हाच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे चिरंजीव आमदाराने डीपी बदलून पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे प्रहारनेही आपली भूमिका बदलेली आहे. केवळ भाजपप्रणित बातम्या लावून राणेंनी भाजपवासीय झाल्याचे संकेत दिले आहेत. परंतु त्यांना पक्षात प्रेवश दिला जात नाही. दुसरीकडे कॉँग्रेसवाले त्यांना आपले मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे राणे यांची आवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे.

राणे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यापासून पक्षाला काय फायदा होणार किंवा ते आले नाही तर काय फरक पडणार, असा दोलायमान स्थितीत पक्ष पोहोचला आहे. राणेंना भाजपमध्ये घेतल्यास उलट पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. जुने जाणकार मंडळी राणेंच्या विरोधात आहेत. दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेली शिवसेना राणेंची खरी शत्रु आहे, त्यामुळे शिवसेना-भाजपमधील नाते तुटण्याची शक्यता आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेत पराभव झाल्यानंतर शिवसेना गलितगात्र झाली आहे. भाजपचे पाय धरण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. परिणामी सध्या तरी सरकारला धोका नाही, त्यामुळे राणे यांना घेतले किंवा नाही घेतले तरी काही फरक पडणार नसल्याचे भाजपातील दुढ्ढाचार्यांना वाटते. त्यामुळे राणे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे.

नुकतेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईचा दौरा केला. परंतु त्यांनी राणेंच्या प्रवेशावर काहीही बोलणे टाळले. उलट नारायण राणे यांना गोंजारण्यासाठी रावसाहेब दानवे यांना राणेंच्या घरी पाठवून आम्ही अजुनही तुमच्याचसोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

राणे यांचा योग्यवेळी वापर करता येईल, असा व्होरा काहीजण लावत आहेत. तुर्तास तरी राणे यांचे ना घर का ना घाटका अशी स्थिती झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निर्बंधांना झुगारून मनसेने दहीहंडी फोडली!

News Desk

मशिदीवरील भोंगे लावण्यास परवानगी द्या, AISJU संघटनेचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

Aprna

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा;शहिदांना अभिवादन 

News Desk
मुंबई

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

News Desk

मुंबई : धडपडत, चाचपडत रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने एकदाचा टीवाय बीकॉमचा निकाल जाहीरकेला खरा, पण अद्यापही तो विद्यार्थ्यांना काही पाहाता आलेला नाही. संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचे कारण यासाठी देण्यात येत असले, तरीही त्याने त्रस्त विद्यार्थ्यांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे सोमवारी अनेकविद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिलदरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन सुरू आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही ४० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेलेनाहीत. काही निकाल तांत्रिक अडचणींमुळे राखीव ठेवले आहेत. मात्र येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

मालवानीत इमारतीचे छत कोसळले, दोन जण जखमी

News Desk

आर. के. स्टुडिओच्या आगीची ही आहेत खरी कारणे

News Desk

गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या कॉन्स्टेबलचे निलंबन.

News Desk