HW News Marathi
देश / विदेश

उत्तर भारतात ४१ पूरबळी!

पाटणा उत्तर भारतात पुराने थैमान घातले आहे. उत्तरेकडील १० राज्यांत आलेल्या या पुराने आतापर्यंत सुमारे ४१ जणांचा बळी घेतलाआहे. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसामसह आदी १० राज्यांत महापुर आला आहे. दरम्यान, नेपाळच्या तराई भागात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी झाल्यामुळे तेथून येणाऱ्या जलप्रपाताने सखल भाग असलेलाबिहार जलमय झाला आहे. गंगेसह, कोसी, महानंदा नदीला पूर आला असून बिहारच्या किशनगंज, पूर्णिया, अररिया, कटिहार, पश्चिमचंपारण, सहरसा आणि सुपौलसह १२ जिल्ह्यांना त्याचा फटका बसला आहे. येथील रेल्वे, वीज आणि दूरसंचार सेवा ठप्प झाली असूनलष्कर, एनडीआरएफ, हवाई दलाने बचाव मोहीम हाती घेतली आहे. तब्बल ४० लाख लोकांना या पुराचा तडाखा सहन करावा लागत आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून नेपाळमध्ये ३ ते १० पट अधिक पाऊस झाला आहे. नेपाळमध्ये प्रचंड पावसानंतर वाल्मीकीनगर गंडकबांधातून सुमारे १० लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले. तसेच पूर्वांचलमध्येही मोठा पाऊस होत आहे. त्यामुळे बिहारमध्ये ३०० टक्केअधिक पाणी आले आहे.

३० वर्षांचा विक्रम मोडीत

ब्रम्हपुत्र नदी दुसऱ्यांदा दुथडी भरून वाहतेय. यात १० जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या ७० टक्के भागांत पाणी आहे. यंदा पावसाने ३०वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. कैलास मानसरोवर मार्गावर चौघे ठार पिथौरगड जिल्ह्यात कैलास मानसरोवर मार्गावर सोमवारी पहाटे ढगफुटी होऊन ३ जवानांसह चौघे ठार झाले असून 6 जण बेपत्ता आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, मिटकरींचा थेट फडणवीसांवर निशाणा 

News Desk

मोदींच्या ‘मन की बात’ व्हिडिओला ४ लाखांपेक्षा जास्त डीसलाईक

News Desk

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दानवेंच्या घरी महत्वाची बैठक!

News Desk
देश / विदेश

अॅम्बी व्हॅलीवर बोली लावण्यास सुरुवा

News Desk

मुंबई : गुंतवणूदारांचे पैसे बुडविल्याप्रकरणी अनेक महिने तुरुंगात डांबण्यात आलेले सहारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुब्रातो रॉय यांना जोरदार हादरा बसला आहे. कारण त्यांच्या लोणावळा येथील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. ६७ हजार ६२१ एकरवरीलया संपूर्ण मालमत्तेची किंमत तब्बल ३४ हजार कोटी असून तसेच लिलावाची बोली ३७, ३९२ कोटीपासून सुरू झाली आहे.

मुंबई उच्च न्यायलयाने आजच अॅम्बी व्हॅलीसाठी लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली. लिलावाला स्थगिती मागणारी याचिकागुरुवारी फेटाळून लावण्यात आली होती. दरम्यान, मॉरिशसमधील रॉयल पार्टनर्स इन्वेस्टमेंट फंड या कंपनीने अॅम्बी व्हॅलीमध्ये १० हजार ७०० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली होती. तर सहारा समुहाच्या मते अॅम्बी व्हॅलीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

कमांडर अभिलाष यांना सुखरूपपणे वाचविण्यात यश

Gauri Tilekar

लायन एअरवेजचे विमान कोसळले

News Desk

मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार सक्ती

News Desk