HW News Marathi
मुंबई

 दिव्याचा दिव्य अभिनय, तीन तास जमिनीखाली

मुंबई : सिनेमा बनवणे हे साधे काम नाही. त्याला मिळणारे ग्लॅमर पाहता त्याचा मोह भल्याभल्यांना होतो. पण त्यासाठी कलाकार कामही खूप करत असतात. अभिनेत्री दिव्या दत्ताचे असेच काहीसे झाले आहे. बाबूमोशाय बंदूकबाज या सिनेमाच्या सीनसाठी ती तब्बल तीन तास जमिनीखाली राहीली होती.

या सिनेमातील एका दृश्यात दिव्याला जमिनीखाली गाडून घ्यायचे होते. केवळ शीर जमिनीवर आणि धड जमिनीखाली असा हा प्रकार होता. परंतु लखनऊ सारख्या भागात मालीची उष्णता असूनही दिव्याने हे दिव्य पत्करले आणि निभावले. सिनेमात तिचा हा अवतार दिसेल. ती जमिनीखाली गेल्यानंतर सर्व टिम कामाला लागली आणि पुढच्या तीन तासात त्याचे सर्व सीन शूट करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पडसलगीकरांना तीन महिन्यांची मुदतवाढ

News Desk

मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ब्रेक, वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

News Desk

पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअरच्या वतीने केरळ पुरग्रस्तांना मदत

News Desk
देश / विदेश

एस.सी – एस.टी कायद्या विरोधात आझाद मैदान येथे धरणे आंदोलन

News Desk

मुंबई | एस.सी – एस.टी कायद्याचा विरोध करणाऱ्या अनारक्षित वर्गानं आज ६ सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारलाय. बंद दरम्यान हिंसात्मक घटना रोखण्यासाठी मध्यप्रदेशात दुपारी तीन वाजेपर्यंत कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. तसेच परवानगीविना आंदोलन, रॅली आणि समुहात एकत्र येण्याला बंदी घालण्यात आली आहे. या बंदमध्ये मुंबईत आझाद मैदान येथे देखील धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

एस.सी – एस.टी कायद्याचा विरोधात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदान येथे 250 ते 300 इंटरनेशनल प्रेस कम्युनिटीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे. यावेळी संविधानानुसार 10 वर्ष आरक्षण लागू केलं गेलं, आपला देश जर संविधानिक प्रक्रियेचे पालन करतो, तर संविधानानुसार तात्काळ आरक्षण रद्द केलं पाहिजे. आमच्या अश्या अनेक मागण्या आहे. आणि जर आज मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालू. असे देखील डॉ परविंदर पांडे यांनी सांगितले.

मध्यप्रदेशात सपाक्स, करणी सेना आणि ब्राह्मण संघटनांसोबत इतर सवर्ण संघटनांनी या भारत बंदचं समर्थन केलंय. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत जिल्ह्यातील पोलिसांना अलर्ट करण्यात आलंय. या बंदमुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जन आशीर्वाद यात्रातल्या आपल्या सभा हेलिकॉप्टरनं पूर्ण करणार आहेत. नुकताच, शिवराज यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेक आणि एससी-एसटी कायद्याचा विरोध पाहता हा निर्णय घेण्यात आला.

सवर्ण संघटनांचं देशव्यापी आंदोलन पाहता बिहारमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. मुंबई, मध्यप्रदेशच्या श्योपूर, छतरपूर, अशोकनगर, गुना, ग्वालियर, मुरैना, शिवपुरी, दतिया आणि भिंड या जिल्ह्यांना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलंय. याशिवाय इंदोर, भोपाळ, ग्वालियर, दतिया या जिल्ह्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जबलपूर जिल्हाधिकारी छावी भारद्वाज यांनी राज्याच्या गृहविभागाला चिठ्ठी लिहून बंद दरम्यान इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची मागणी केलीय. मध्यप्रदेशातील पेट्रोल पंप संचालक असोसिएशननं पेट्रोल पंप ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

Related posts

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या सत्तेचा मार्ग मोकळा

News Desk

काँग्रेस उमेदवार अलका लांबांनी ‘आप’च्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावली

swarit

पत्नीने पतीच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपली

News Desk