HW News Marathi
राजकारण

चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री !

मुंबई | “चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री आहेत. लोकांकडून पाच-दहा हजार रुपये उसने मागणारा माणूस आज लोकांच्या घरी गेला की किती पैसे पाहिजेत असे विचारतो. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची माहिती आहे. मी त्यांच्याबद्दलची सगळी माहिती, पुरावे घेऊन येतो. त्यांनी माझ्याबद्दलचे पुरावे घेऊन यावे”, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर कारखानदारांसोबत सेटलमेन्ट केल्याचा आरोप केला होता. हा आरोप चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध करुन दाखवावा, असे आव्हान राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

“मी कारखानदारांसोबात सेटलमेन्ट करून माझे घर भरले असे चंद्रकांत पाटील म्हणतात. भाजपकडे शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची संपूर्ण माहिती आहे. त्यांनी अभियंत्यांकडून किती घेतले, ठेकेदारांकडून किती घेतले, मातीत किती घेतले ही सगळी माहिती घेऊन पुरावे घेऊन मी बिंदू चौकात येतो. त्यांनीही त्यांच्याकडील माझी माहिती घेऊन यावे”, असे राजू शेट्टी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?

Aprna

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधींचे ट्विट  

News Desk

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो !

News Desk
राजकारण

मुंबईतील उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग आजपासून सुरू

News Desk

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील उमेदवारांनी अर्ज भरला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३० मुंबई दक्षिण-मध्य आणि ३१ मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल आज (२ एप्रिल) करण्यास सुरुवात केला होता.

या उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी (९ एप्रिल) असून या अर्जांची छाननी बुधवारी (१० एप्रिल) होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १२ एप्रिल २०१९ आहे. मुंबई शहर जिल्ह्यासाठी ५२७ ठिकाणी दोन हजार ६०१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. धारावीसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एका शाळेत जास्तीत जास्त ५८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जोंधळे यांनी सांगितले.

 

 

Related posts

कार्यकर्त्यांचा आग्रह, शरद पवार निवडणूक लढविणार का ?

News Desk

२००० रुपयांची निवडणुकांमध्ये वाटायला आणली का ?

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

Aprna