HW News Marathi
राजकारण

२ पेक्षा अधिक मुले झाल्यास मिळणार इन्सेंटिव्ह !

विजयवाडा । दोन पेक्षा अधिक मुले झाल्यास अशा दाम्पत्यांना इन्सेंटिव्ह मिळणार अशी अजब घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवता येत नव्हती. मात्र ती अट सुद्धा नायडूंनी शिथिल केली आहे. नाडूंच्या अशा आगळ्या वेगळ्या घोषणेमुळे कुटुंब नियोजन पद्धतीच्या नियमांचही उल्लंघन होत आहे. यामुळे त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका होत आहे.

लोकसंख्या वाढीचा दर कायम ठेवणे आवश्यक आहे. राज्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. गेल्या १० वर्षात राज्याची लोकसंख्या १.६ टक्कयांनी कमी झाली आहे. असंच चित्र राहीलं तर येणाऱ्या काळात खाणारे जास्त आणि कमावणारे कमी होतील. राज्यातील ५० टक्के जनता सध्या तरुण पीढीची आहे. राज्याला कायम तरुण ठेवण्यासाठी अधिक मुलं जन्माला येणं आवश्यक आहे. त्यामुळे जास्तित जास्त अपत्य जन्माला घाला. असं आवाहनही चंद्राबाबूंनी केलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

छिंदम मारहाण प्रकरणी सेनेच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

News Desk

महिलांचे रक्षण हीच आमची संस्कृती | ठाकरे

News Desk

जनतेसोबत मोदींच्या संवादाला सुरुवात

swarit
मनोरंजन

अभिनेता मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

News Desk

मुंबई | बॉलिवूडचे डिस्को डान्सर आणि दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. मिथुन त्यांच्या सोबत त्यांच्या मुलगा महाअक्षय चक्रवर्ती आणि सून मदालासा शर्माही अमेरिकेत आहेत.

गेल्‍या वर्षभरापासून त्‍यांना पाठदुखीचा त्रास होत होता. त्‍यामुळे चित्रपटांच्‍या प्रोजेक्‍टवर त्‍यांना लक्ष देता येत नव्‍हते. यावर्षी मे महिन्‍यात त्‍यांना उपचारासाठी दिल्ली येथे आणण्‍यात आले होते. परंतु, आता मिथून चक्रवर्ती यांच्‍यावर लॉस एंजेलिसमध्‍ये उपचार सुरू असल्‍याचे वृत्त आहे. काही दिवसांपासून ते तेथील रुग्‍णालयात दाखल असल्‍याचे वृत्त आहे.

२००९ मध्ये लकी चित्रपटातील एक सीन करताना मिथुन चक्रवर्तींना दुखापत झाली. तेव्हापासून त्यांना पाठदुखीचा त्रास जडला आहे. २००९ मध्ये दुखापत झाल्यावर त्यांनी उपचार देखील घेतले होते. परंतु २०१६ मध्ये त्यांना पाठदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांनी एक मोठा ब्रेक घेऊन या पाठदुखीवर उपचार केले. पाठदुखीचा त्रास त्यांना जास्त होऊ लागल्याने त्यांनी सध्या काम करणेही सोडले आहे.

 

Related posts

Kargil Vijay Diwas : सैनिकांचे साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण करून देतो !

News Desk

संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचे निधन

News Desk

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

swarit