HW News Marathi
राजकारण

पाकिस्तानने अल्पसंख्यांकांच्या अधिकारांबाबत भारताकडून शिकावे !

नवी दिल्ली | “पाकिस्तानच्या संविधानानुसार पाकिस्तानचा राष्ट्रपती हा केवळ एक मुसलमान व्यक्तीच होऊ शकतो. मात्र, भारताचे अनेक राष्ट्रपती हे वंचित समाजातील होते. त्यामुळे पाकिस्तानने अल्पसंख्यांकांच्या अधिकारांबाबत भारताला शिकविण्याची आवश्यकता नाही. उलट याबाबत पाकिस्ताननेच भारताकडून शिकण्याची आवश्यकता आहे”, असा टोला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी लगावला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताबाबत केलेल्या विधानानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

“काही भारतीयांच्या म्हणण्यानुसार भारतात अल्पसंख्यांकांना इतर नागरिकांप्रमाणे समान वागणूक मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही मोदी सरकारला दाखवू की अल्पसंख्यांकांसोबत कसे वागायचे”, असे वक्तव्य इम्रान खान यांनी केले होते. प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शहांनी भारतात त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी भारताबाबत असे वक्तव्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप नेत्याच्या ट्विटरवरून मोंदींवर सडकून टीका

News Desk

राहुल गांधींच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

News Desk

प्रकाश आंबेडकरांचा महत्वपूर्ण निर्णय

News Desk
राजकारण

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk

पंढरपूर | राफेल डील हा घोटाळाप्रमाणे पीक विमा योजनेमध्येही मोठा घोटाळा झाला असल्याचा सवाल उपस्थिती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला आहे. पंढरपूरच्या जाहीर सभेत म्हटले आहे. पुढे ठाकरे असे म्हणाले की, मराठवाडा विदर्भात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. केंद्राच्या पथकाने पाहणी केली मात्र शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना कुठे गेल्या? असेही ते म्हणाले.पीक विमाच्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून बोगस पीक विमाच्या कंपन्यांवर कारवाई करा, असे त्यांनी यावेळी सांगितल.

यावरून कांदा प्रश्न कशी सोडवताय? पीक विमा कधी देताय ते सांगा? कर्जमाफ केलेला शेतकरी दाखवा असा खडा सवाल करत या गोष्टी पहिल्यांदा पूर्ण करा, नंतर बाकीचे बघू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मला सत्ता नसली तरी चालेल, परंतु इथला शेतकरी सुखी राहायला हवा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच जानेवारीपासून उद्धव ठाकरे स्वतः दुष्काळग्रस्त भागात फिरणार आहे.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी राफेल घोटाळ्यावरूनही भाजप सरकारव टीका केली. ठाकरेंनी म्हटले की, सैन्यासाठी विमाने खरेदी करता त्यात तुम्ही घोटाळे करता. दुसरीकडे सैन्याची पगारवाढ प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आहे. सैन्याची पगारवाढ नाही आणि शस्त्र सामग्रीत घोटाळा करता, किती पापे कराल, असे म्हणत जय जवान- जय किसानचा नारा खोटा ठरवला आहे, असे ठाकरे म्हणाले.

Related posts

एकनाथ शिंदेंनी केली सुनील प्रभू यांची विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावरून उचलबांगडी

Aprna

ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला | आठवले

News Desk

संविधान जाळणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे | नवाब मलिक

News Desk