HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सैन्य-दहशतवाद्यांमधील चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परंतु, हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या चकमकीनंतर परिसरातून दारूगोळ्याचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील ही चकमक अद्यापही सुरु आहे. त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.

त्राल येथे झालेल्या या चकमकीत भारतीय सैन्याकडून खात्मा करण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांमध्ये झाकिर मुसाचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या दहशतवाद्याला देखील ठार केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी (२१ डिसेंबर) कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला होता. पाकिस्तान सैन्याने केलेल्या या गोळीबारात भारतीय सैन्याच्या २ अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजस्थान सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी

News Desk

आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला, आता ममता बॅनर्जी नेमके तेच करीत आहेत !

News Desk

जेएनयूच्या जीवघेण्या हल्लाचा देशभरातील विद्यार्थ्यांसह दिग्गज नेत्यांनी नोंदविला निषेध

News Desk