HW News Marathi
राजकारण

भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगढच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली | भूपेश बघेल यांनी आज (१७ डिसेंबर) छत्तीसगढच्या मुख्यमंत्री पदाची शपथ लागली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी बघेला यांना गोपनीयतेची शपथ दिली. बघेल यांच्यासोबत टी एस सिंहदेव आणि ताम्रध्वज साहू यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. शपथविधीच्या काही तास आधीच पाऊस सुरु झाल्याने शपथविधीचे स्थळ बदलण्यात आले. हा सोहळा सायंन्स कॉलेज मैदानावर होणार होता. मात्र, ऐनवेळी बलवीर सिंह जुनेजा इनडोअर स्टेडिअमवर हा सोहळा घेण्यात आला.

राजस्थानमध्ये सकाळी १०.३० वाजता अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये सायंकाळी चार वाजता कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी मध्य प्रदेशाच्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा मोठा निर्णय घेतला. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेता मोतीलाल वोरा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला, परंतु रावणराज जास्तकाळ चालत नाही !

News Desk

आम्हाला त्यावेळी काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही, आता आम्ही मागे हटणार नाही !

News Desk

धैर्यशील मानेंनी घेतला राजू शेट्टींच्या मातोश्रींचा आशीर्वाद

News Desk
राजकारण

‘लोकसंघर्ष मोर्चा’ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk

मुंबई | वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला आहे.शेतकरी आणि आदिवासींचा ‘लोकसंघर्ष मोर्चा’ सोमय्या मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे.

शेतकरी सरकार विरोधात घोषणा देत पायी चालत आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी(२१ नोव्हेंबर)ला सोमय्या मैदानात मुक्काम केला. त्यानंतर आज(२२ नोव्हेंबर)ला पहाटे साडेचारच्या सुमारास शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या विराट मोर्चात महिला, पुरुषांसह वृद्ध आणि लहान मुलंही सहभागी झाले आहेत.

लोकसंघर्ष मोर्चा सध्या लालबागमध्ये पोहचला आहे. काही वेळातच हा मोर्चा आझाद मैदानात दाखल होईल. या शेतकऱ्यांची चौकशी करून परिस्थितीचा जाणून घेण्यासाठी कल (२१नोव्हेंबर)च्या रात्री उशिरा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला आहे. प्रतिभा शिंदे काही सहकाऱ्यांसह दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडतील.

या शेतकरी मोर्चा मंगळवारी (२०नोव्हेंबर)ला मुंबईत दाखल झाला आहे. हा मोर्चा लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.या मोर्चात संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, साताऱ्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले आहेत. ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्यातील आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.

ज्येष्ठ न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील अध्यक्ष असून जलपुरुष राजेंद्र सिंग, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काळू राम काका दोधडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यात राष्ट्र सेवादला, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती संघटना यांचे कार्यकर्ते मोर्चा सहभागी होणार आहेत.

 

Related posts

शहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल

News Desk

भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु | संजय राऊत

News Desk

कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त सरकार

News Desk