HW News Marathi
महाराष्ट्र

धुळे-नगर महानगरपालिकेत भाजपचे वर्चस्व

धुळे | भाजपचे कमळ फुलण्याची चिन्हे धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही दिसत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि शिवसेनेने सोडलेली साथ अशा प्रतिकुलू परिस्थितीवर मात करत भाजपने धुळे आणि नगरमध्ये बाजी मारली आहे.

२०१३ साली झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. अहमदनगरमध्येही त्यांचे फक्त नऊ नगरसेवक होते. आज(१० डिसेंबर) सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपने धुळ्यात ३० जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर नगरमध्ये १९ जागांवर आघाडी घेतली आहे. अनिल गोटे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने काँग्रेस आघाडीसह, शिवसेनेच्याही आशा पल्लवित झालेले चित्र दिसत आहे. परंतु लोकसंग्राम पक्षाला मतदारांनी साफ नाकारलेले चित्र दिसून येत आहे.

अनिल गोटेंबद्दलची नाराजी असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचे बंड भाजपच्या पथ्यावरच पडल्याचे मानले जाते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील मतदारांचा विश्वास, या निकालांमधून पुन्हा सिद्ध झाला आहे. मराठा आरक्षणही भाजपला फळल्याचे जाणकारांचे मत आहे. धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकांमध्ये अंतिम आकडे कसे असतील आणि त्यानंतर काय समीकरणे पाहायला मिळतात, याबद्दल उत्सुकता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“अजित पवारांचं थेट नाव घेत नाही पण…”, चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

News Desk

भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकीचे बॉम्बने उडवून देण्याची धमकी

News Desk

संभाजी भिडेंना २६ मार्चपर्यंत अटक करण्याचे अल्टिमेटम

News Desk
महाराष्ट्र

सत्ताधारी असूनही शिवसेना विरोधकांसारखी आंदोलनाची भाषा करते !

News Desk

मुंबई | शिवसेना बुधवारी (१७ जुलै) पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार असल्याची घोषणा काहीच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शेतकऱ्यांसाठीच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “महाराष्ट्रात २०१४ सालापासून शिवसेना भाजपचे सरकार असूनही शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखी शिवसेनेला आंदोलने करण्याची भाषा करावी लागते. शेतकऱ्यांसाठी ही मोर्चा काढण्याची भाषा म्हणजे केवळ शिवसेनेची नौटंकी आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

“शिवसेना येत्या १७ जुलैला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असून मोर्चा शेतकऱ्यांंचा नव्हे तर शेतकऱ्यांंसाठी असणार आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काहीही बोलत नाही आणि बाहेर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात. सत्ताधारी पक्षाने लोकांच्या समस्या सोडविणे अपेक्षित असते. मात्र, शिवसेनेचे सरकारमध्ये काही चालत नाही”, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related posts

INS विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा केलेला नाही! – किरीट सोमय्या

Aprna

पुण्यातील कोरोनाच्या आढावा बैठकीला अजित पवारांची दांडी, चर्चांना उधाण

News Desk

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल, तपासाला सुरुवात

News Desk