HW News Marathi
देश / विदेश

नोटबंदीनंतर देखील निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर !

मुंबई | नोटबंदीच्या निर्णयाबाबत माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी नोटबंदीबाबत मोदी सरकारला फटकारले असतानाच माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनीसुद्धा नोटाबंदीच्या निर्णयावर बोट ठेवले आहे. नोटाबंदीमुळे निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर थांबला नाही. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी निवडणुकीत अधिक काळे धन जप्त करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

ओ. पी. रावत हे नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशांच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. “नोटबंदी झाल्यानंतर निवडणुकीत पैशाचा गैरवापर कमी केला जाईल”, असे सांगितले गेले होते. मात्र, निवडणुकांवेळी जप्त केलेल्या काळ्या पैशांचा आकडा पाहता हा दावा योग्य ठरू शकत नाही. राजकीय वर्ग आणि त्यांच्या वित्त पुरवठादारांकडे पैशाची कमतरता नाही. निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा वापर होणे ही चिंतेची बाब आहे. अशा प्रकारे वापरलेले पैसे सामान्यतः काळे असतात. निवडणुकीत काळा पैसा वापरला जातो, असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांनीच केला मोदींसोबतच्या भेटीचा खुलासा

News Desk

जाणून घ्या… गुरूपौर्णिमेचे महत्व

News Desk

#PulwamaAttack : माझ्या दुसऱ्या मुलालाही सीमेवर पाठवेन, परंतु पाकिस्तानला धडा शिकवा !

News Desk
राजकारण

अनिल अंबानी मोठ्या आर्थिक संकटात, दोन कंपन्यांच्या खात्यात १९ कोटी

News Desk

मुंबई | उद्योगपती अनिल अंबानी राफेल डील घोट्यामुळे सध्या चर्चेत आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व रिलायन्स टॉवर्स या दोन कंपन्यांच्या १४४ खात्यांत फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. अमेरिकन टॉवर्स कंपनीच्या (एटीएल) प्रकरणात रिलायन्सने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. त्यावरील याचिकेवर उत्तर देताना रिलायन्सने कोर्टात ही माहिती दिली आहे. त्या वेळी कंपनीच्या डोक्यावर ४६ हजार कोटींचे कर्ज आहे.रिलायन्स कम्युनिकेशन्स वायरलेस दूरसंचार क्षेत्रात कार्यरत होती. परंतु भरमसाठ तोट्यामुळे कंपनीने व्यवसाय बंद केला आहे. त्यासाठी हायकोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान आरकॉमने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कंपनीच्या खात्यात अत्यल्प पैसे असल्याचे उघड केले आहे.

आरकॉमच्या एकूण ११९ बँक खात्यांमध्ये १७ कोटी ८६ लाख रुपये आहेत. रिलायन्स टॉवर्स या उपकंपनीच्या २५ खात्यांत १ कोटी ४८ लाख आहेत. दोन्ही मिळून कंपनीच्या खात्यात फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. त्यामुळेच एटीएलच्या २३० कोटींची थकबाकी देणे शक्य नाही, असे कंपनीने म्हटले आहे. कर्जपरतफेडीसाठी आरकॉमने त्यांच्या मालमत्तेची रिलायन्स जिओला १८ हजार कोटींना विकण्याचा निर्णय घेतला होता. रिलायन्स जिओची तयारीही अंतिम टप्प्यात होती, पण त्याच वेळी एरिक्सन कंपनीने ५५० कोटींच्या वसुलीसाठी या व्यवहाराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

 

Related posts

गुवाहाटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रवी राणांची दिलगिरी; तर बच्चू कडू उद्या भूमिका मांडणार

Aprna

…तर आयकर विभाग पंतप्रधान मोदींच्या घरावर छापा टाकणार का ?

News Desk

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख हरवून बसला आहे !

News Desk