HW News Marathi
देश / विदेश

अखेर अनिल अंबानींनी राफेल करारावरील मौन सोडले

मुंबई | राफेल करारावरून राजकारण आधीच तापलेले असताना उद्योगपती अनिल अंबानी यांनी देखील या विषयावरील मौन अखेर सोडले आहे. मी स्वतः राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने राफेल करारासंदर्भात दिलेली माहिती ही दिशाभूल करणारी आणि चुकीची असल्याचेही उद्योगपती अनिल अंबानी यांनी म्हटले आहे. ‘शेवटी विजय हा सत्याचाच होतो’, या शब्दात अनिल अंबानी याविषयावर आपले मत व्यक्त झाले.

राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. काँग्रेसच्या काळात एका विमानाची किंमत ५२० कोटी रुपये होती. जी या नवीन करारात १६०० कोटी रुपये झाल्याचा आरोप करीत याचे लाभ अनिल अंबानींना देखील पोहोचविण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राफेल विमान खरेदी करारात अनिल अंबानी यांची कंपनी पार्टनर आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाष्य केले. राहुल गांधींची राफेल विमानाच्या किंमती संदर्भातील सर्व वक्तव्ये खोटी असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे राफेल करारावरून राहुल गांधींनी सुरु केलेला वाद हा अत्यंत बाळबोध आहे आणि ह्यावरूनच त्यांची समजून घेण्याची क्षमता किती कमी आहे हे लक्षात येते, या शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदींचे शेतकरी बांधवांना आवाहन….

News Desk

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

swarit

१८ हजारांपेक्षा कमी वेतन देण्यावर लवकरच प्रतिबंध

News Desk
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव प्रकरणी यशस्वीरित्या तपास करू | आयुक्त

swarit

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला भीमा-कोरेगाव हिंसाचार याप्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात सांगितले असून आम्ही लवकरच न्यायालयासमोर ते सादर करू. यशस्वीरित्या हा तपास आम्ही पुर्ण करू असा विश्वास पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशन व्यक्ती केला आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून देशभरात छापे टाकून पुणे पोलिसांनी ५ जणांना अटक केले होते. सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फेरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव या पाच जणांना पोलिसांनी अटक केले आहे. या सर्वांच्या घरातून लॅपटॉप, हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह, पुस्तके अशा विविध गोष्टी पोलिसांनी या पाच व्यक्तींच्या घरातून जप्त केले आहे. या सर्व साहित्याचा आम्ही तपास करत असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशन यांनी दिली आहे.

या पाच जणांना पोलीस कोठडीत न ठेवता त्यांच्या घरी नजरकैद (हाऊस अरेस्ट) ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (२९ ऑगस्ट)ला दिले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत नजर कैदेतठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या या आदेशाने पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट

पुणे पोलिसांनी या पाच व्यक्तींच्या घरी छापे टाकल्यानंतर तपासात मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. बंदी असलेल्या माओवादी संघटनांनी या कार्यकत्यांचा संबंध असल्याचे माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली.

Related posts

ठाकरे सरकार मधील आणखीन काही नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर!

News Desk

मंत्रालयाचे वेळापत्रक बदलले, २ शिफ्ट ऐवजी एक दिवसाआड होणार काम!

News Desk

नागपूरमध्ये नाराज शिवसैनिकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk