HW News Marathi
देश / विदेश

अखेर अनिल अंबानींनी राफेल करारावरील मौन सोडले

मुंबई | राफेल करारावरून राजकारण आधीच तापलेले असताना उद्योगपती अनिल अंबानी यांनी देखील या विषयावरील मौन अखेर सोडले आहे. मी स्वतः राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने राफेल करारासंदर्भात दिलेली माहिती ही दिशाभूल करणारी आणि चुकीची असल्याचेही उद्योगपती अनिल अंबानी यांनी म्हटले आहे. ‘शेवटी विजय हा सत्याचाच होतो’, या शब्दात अनिल अंबानी याविषयावर आपले मत व्यक्त झाले.

राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. काँग्रेसच्या काळात एका विमानाची किंमत ५२० कोटी रुपये होती. जी या नवीन करारात १६०० कोटी रुपये झाल्याचा आरोप करीत याचे लाभ अनिल अंबानींना देखील पोहोचविण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राफेल विमान खरेदी करारात अनिल अंबानी यांची कंपनी पार्टनर आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाष्य केले. राहुल गांधींची राफेल विमानाच्या किंमती संदर्भातील सर्व वक्तव्ये खोटी असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे राफेल करारावरून राहुल गांधींनी सुरु केलेला वाद हा अत्यंत बाळबोध आहे आणि ह्यावरूनच त्यांची समजून घेण्याची क्षमता किती कमी आहे हे लक्षात येते, या शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन

News Desk

आसाराम बापूचा आज निकाल, जोधपूरलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

News Desk

बेस्ट टॉयलेट पेपर सर्च करताच पाकिस्तानचा झेंडा, गुगल म्हणते आमचा दोष नाही

News Desk