HW News Marathi
राजकारण

संभाजी ब्रिगेडचा राजकारणात प्रवेश

मुंबई | औरंगाबादमध्ये २९ नोव्हेंबरला स्वराज्य संकल्प मेळाव्याची सांगता करत संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. आज पत्रकार परिषद घेत ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी ही माहिती दिली. लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.

आगामी निवडणुकीचे बिगुल फुंकण्यासाठी ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पुढील वाटचालीबाबत सखोल मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बऱ्याच मतदार संघात स्वबळावर लढण्याची तयारी आहे. तसेच समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचे ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.

सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते, मात्र स्वतःचे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही, असे डोके यांनी म्हटले आहे. तरूणांच्या रोजगाराऐवजी शहरांचे नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

द्रौपदी मुर्मू: भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींबद्दल माहित नसलेल्या घटना

News Desk

हिंदू संस्कृतीमधल्या पवित्र वैवाहिक नात्यावर मोठाच हल्ला | ठाकरे

News Desk

सोनिया गांधी-स्मृती इराणींच्या भांडणात सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने वाद निवळला

Aprna
कृषी

पंतप्रधान मोदी साधणार शेतक-यांशी संवाद

News Desk

नवी दिल्ली | साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. आज नरेंद्र मोदी त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मागील काही काळात केंद्र सरकारकडून ज्या उपाय योजना करण्यात आल्या, त्यांची माहिती मोदी शेतकर्‍यांना या भेटीदरम्यान देणार आहेत.

तसेच ऊस उत्पादनाला चालना मिळण्यासाठी मोदी सध्या शेतक-यांशी संवाद साधून माहिती देणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पंजाबसह अन्य ऊस उत्पादक राज्यातील दीडशे शेतकर्‍यांशी मोदी यावेळी संवाद साधणार आहेत अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

Related posts

मराठवाड्यात बळीराजा पावसाचा प्रतिक्षेत

News Desk

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk

माझं मत- तुमच्या शहरातील एटीएमध्ये पैसे आहेत का ?

News Desk