HW News Marathi
राजकारण

आता धनगर आरक्षणावरून सरकारची कोंडी ?

मुंबई | मराठा आरक्षणाचे विधेयक आज अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. या दोन्ही सभागृहात विरोधकांकडून मराठा आरक्षणाच्या या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. आता मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारची कोंडी करण्याचा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन ३ महिने होऊनही सरकारने यावर अद्याप एटीआर आणला का नाही ?, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहेत, त्या पद्धतीचा हा धनगर आरक्षणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातील काही बाबींची पूर्तता करून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला देखील आरक्षण देण्यात येईल. आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही धनगर आरक्षणाचा एटीआर आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत सादर करु, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“टीका करणं सोपं असतं” – अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलीलांवर निशाणा

News Desk

राम कदम बेताल वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर होत आहेत ट्रोल

News Desk

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यभरात नाराजी

Aprna
महाराष्ट्र

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर

swarit

उल्हासनगर विषारी गॅसच्या गळतीमुळे एका हंगामी कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाला. तर विषारी गॅस नाका-तोंडात गेल्याने ११ कामगारांना गंभीर अवस्थेत कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उल्हासनगर-शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत घडली असून संजय शर्मा (३४) असे गुदमरुन मृत्यू झालेल्या हंगामी कामगाराचे नाव आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत रात्री ९ वाजताच्या सुमाराला गॅसच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच सुमाराला एका गॅसच्या पाईपलाईनमधून विषारी गॅसची अचानक गळती सुरू झाली. यावेळी कुठल्याही प्रकारची कंपनीच्या वतीने कामगारांना सुरक्षा पुरविण्यात आली नसल्याचा आरोप कामगार व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे हंगामी कामगार संजय शर्मा यांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला असून ११ कामगारांना कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान यापूर्वीही अनेक कामगारांनी विषारी गॅस गळतीमुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र या कंपनीत आजही हंगामी कामगारांना राबवून त्यांच्या सुरक्षेतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आजच्या घटनेवरुन समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच गॅस गळती रोखणाऱ्या पथकासह अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र संजय शर्मा या हंगामी कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्याने कंपनीच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर कंपनीच्या ठेकेदाराच्या माहितीनुसार त्याला चार दिवसाचे काम एका दिवसात पूर्ण करण्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही घटना घडल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Related posts

फोन टॅपिंगचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार – देवेंद्र फडणवीस

News Desk

संजय राऊतांनी पुराव्यानिशी केली नारायण राणेंची बोलती बंद, म्हणाले…

News Desk

रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा कामावर रुजू

Aprna