HW News Marathi
राजकारण

केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केजरीवाल यांच्या घरासमोर आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार कार्यक्रमामधून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद इमरान (३८) असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. या संशयिताकडे जिवंत काडतूस सापडल्याने त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबार कार्यक्रमात मोहम्मद इमरान अन्य १२ इमाम आणि मौलवींसह सहभागी झाला होता. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा शिफारस करण्यासाठी जनता दरबारात आले होते, अशी माहिती मिळते. यावेळी तपासणी करताना त्याच्या खिशात पिस्तुलाची जिवंत काडतूस सापडली.

अरविंद केजरीवाल यांच्यावर मागील आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीने मिरची पूड फेकल्याची घटना घडली होती. केजरीवाल सचिवालयात तक्रारी ऐकण्यासाठी गेले असता हा सर्व प्रकार घडला होता. यात केजरीवाल यांचा चष्मा तुटला. सुदैवाने केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवालया हवे होते !

News Desk

विधान परिषदेसाठी दराडेंना निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

News Desk

आम्ही भाजपच्या नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार, जानकरांची भूमिका

News Desk
क्राइम

पाकिस्तानकडून गोळीबार बीएसएफचा एक जवान शहीद

swarit

श्रीनगर – जम्मू-कश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. आरएस पुरा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री ११च्या सुमारास पाककडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारचे सडेतोड प्रत्युत्तर देताना बीएसएफचा एक हेड कॉन्स्टेबल जवान शहीद झाला असून कॉन्स्टेबल आणि तीन नागरिक जखमी झाले आहे.

या गोळीबारीत बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश, आणि कॉन्सटेबल दुबराज मुर्मु जखमी झाले आहे. पाकने वर्षाच्या सुरुवातील झालेल्या गोळीबारमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने दुलंज परिसरात घुसखोरी करणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मदच्या’ सहा दहशवाद्याना जवानांनी यमसदनी पाठविले होते. गोळीबारीनंतर या परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.

Related posts

‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत IT विभागाने काढली वरात; जालन्यात कोट्यवधींचं घबाड जप्त

Manasi Devkar

नोकराने मालकाच्याचं घरी केली चोरी. दिंडोशी पोलिसांनी 24 तासात इंदोरहुन केले अटक

News Desk

“कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा”

News Desk