HW News Marathi
राजकारण

उध्दव ठाकरे शिवनेरीच्या पवित्र मातीचा कलश अयोध्येला नेणार

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देशाला अयोध्येतील राम मंदिराच्या आठवण करून देण्यासाठी २४ नोव्हेंबरला अयोध्यात्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी ठाकरे यांनी गुरुवारी (२२ नोव्हेंबर)ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या असलेल्या शिवनेरी या त्यांच्या जन्मस्थळ किल्ल्यावर जाऊन येथील माती कलशमध्ये भरून ती आयोध्येला नेणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर ठाकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या पवित्र स्थळाची माती राम मंदिराच्या निर्माणासाठी देणार आहेत.

उद्धव ठाकरे २४ आणि २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी ते महाराष्ट्राचे अराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा दर्शनासाठी गुरुवारी(२२नोव्हेंबर)ला पोहचले आहेत. मुंबईसह राज्यातले अनेक शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहेत. अयोध्येत जिथे हा सोहळा पार पडणार असून या ठिकाणी शिवसेना नेत्यांनी पूजा करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे आणि विनायक राऊत यासारखे नेते यावेळी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या एक गटानेही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे

अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नवा नारा दिला. तसेच महिला आघाडी आणि युवासेनेला अयोध्येत येऊ नये असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. राम मंदिर बांधा नाही तर हा फक्त चुनावी चुमला होता हे मान्य करा, असा इशारा ठाकरे यांनी मोदी सरकारला दिला आहे. उद्धव टाकरेंनी दसरा मेळाव्यात अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्या आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार! – मुख्यमंत्री

Aprna

#Elections2019 : जाणून घ्या…बुलढाणा मतदारसंघाबाबत

News Desk

अजित पवार नाराजीच्या बातम्यांवर म्हणाले…

Aprna
राजकारण

‘लोकसंघर्ष मोर्चा’ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk

मुंबई | वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला आहे.शेतकरी आणि आदिवासींचा ‘लोकसंघर्ष मोर्चा’ सोमय्या मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे.

शेतकरी सरकार विरोधात घोषणा देत पायी चालत आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी(२१ नोव्हेंबर)ला सोमय्या मैदानात मुक्काम केला. त्यानंतर आज(२२ नोव्हेंबर)ला पहाटे साडेचारच्या सुमारास शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या विराट मोर्चात महिला, पुरुषांसह वृद्ध आणि लहान मुलंही सहभागी झाले आहेत.

लोकसंघर्ष मोर्चा सध्या लालबागमध्ये पोहचला आहे. काही वेळातच हा मोर्चा आझाद मैदानात दाखल होईल. या शेतकऱ्यांची चौकशी करून परिस्थितीचा जाणून घेण्यासाठी कल (२१नोव्हेंबर)च्या रात्री उशिरा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला आहे. प्रतिभा शिंदे काही सहकाऱ्यांसह दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडतील.

या शेतकरी मोर्चा मंगळवारी (२०नोव्हेंबर)ला मुंबईत दाखल झाला आहे. हा मोर्चा लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.या मोर्चात संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, साताऱ्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले आहेत. ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्यातील आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.

ज्येष्ठ न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील अध्यक्ष असून जलपुरुष राजेंद्र सिंग, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काळू राम काका दोधडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यात राष्ट्र सेवादला, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती संघटना यांचे कार्यकर्ते मोर्चा सहभागी होणार आहेत.

 

Related posts

शहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल

News Desk

भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु | संजय राऊत

News Desk

कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त सरकार

News Desk