HW News Marathi
देश / विदेश

भारतीय लष्कराला तोफांच्या रूपात दिवाळी भेट

नाशिक । शत्रू राष्ट्रांकडून सीमेवर कुरापती सुरूच असतात. त्यामुळे आता भारतीय लष्काराने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराकडे खास शस्त्र सोपवण्यात येणार आहे. ‘के. 9 वज्र’ (कोरियन) आणि ‘एम 777 होवित्जर’ (अमेरिकन) अशा दोन तोफा लष्काराच्या तोफखान्यात दाखल होतील अशी माहिती मिळत आहे.

या निमित्ताने नाशिकमधील देवळाली येथे लष्काराच्या तोफखान्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या क्रार्यक्रमाला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत लष्करप्रमुख बिपिन रावत हे देखील उपस्थित राहणार आहेत. भारतातील खासगी क्षेत्राद्वारे बनवण्यात ही पहिली तोफ आहे. २८-३८ किमी अंतरात ही तोफ मारा करू शकते. ३० सेकंदात तीन तोफगोळे डागण्यास ही तोफ सक्षम आहे.संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ‘के.9 वज्र’ साठी ४,३६६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

Aprna

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी!

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाकडून ‘सेऊल शांतता पुरस्कार’ प्रदान

News Desk
कृषी

पंतप्रधान मोदी साधणार शेतक-यांशी संवाद

News Desk

नवी दिल्ली | साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. आज नरेंद्र मोदी त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मागील काही काळात केंद्र सरकारकडून ज्या उपाय योजना करण्यात आल्या, त्यांची माहिती मोदी शेतकर्‍यांना या भेटीदरम्यान देणार आहेत.

तसेच ऊस उत्पादनाला चालना मिळण्यासाठी मोदी सध्या शेतक-यांशी संवाद साधून माहिती देणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पंजाबसह अन्य ऊस उत्पादक राज्यातील दीडशे शेतकर्‍यांशी मोदी यावेळी संवाद साधणार आहेत अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

Related posts

मराठवाड्यात बळीराजा पावसाचा प्रतिक्षेत

News Desk

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk

माझं मत- तुमच्या शहरातील एटीएमध्ये पैसे आहेत का ?

News Desk