HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील ऊस दर आंदोलनाला आक्रमक रूप

सांगली | ऊस दरावरून सुरू असलेले आंदोलनाला आक्रमक रूप धारण केले आहे. ही मागणीपुर्ण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल आंदोलन सांगली जिल्ह्यात चिघळल्याले चित्रे दिसत आहे. संघटनेने गुरुवारी रात्री मिरज येथील वसंतदादा पाटील कारखाने कसबे डिग्रज आणि वाळवा येथील राजारामबापू पाटील कारखाने विभागीय कार्यालय पेटवून दिले आहे. तसेच ऊस वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉली पेटविल्या आहे.

संघटनेने जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर दुचारी रॅली काढून कारखान्यांच्या व्यवस्थापनास निवेदन दिले होते. ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर मिळावा, दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनानी चार दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. चार दिवसापूर्वी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली होती. त्यानंतर आता वसंतदादा आणि राजारामबापू पाटील कारखान्याची विभागीय कार्यालये पेटवून देऊन कारखाने बंद ठेवण्याचा एकप्रकारे इशारा दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत आहे का?पवारांनी सुनावलं!

News Desk

ट्रक व जीपचा भीषण अपघात; 6 प्रवासी जागीच ठार; अंबाजोगाईजवळील घटना

News Desk

राजगृहावर झालेल्या तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केले शांततेचे आवाहन

News Desk