HW News Marathi
मुंबई

दिवाळीनिमित्ताने मेगाब्लॉक रद्द

मुंबई | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे. दिवाळीच्या निमित्ताने मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र हार्बर रेल्वेवर सीएसएमटी- चुनाभट्टी-वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी-वांद्रे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

तसेच चुनाभट्टी-सीएसटी मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.४० वाजेपर्यंत सेवा खंडित राहील. या कालावधीत पनवेल ते कुर्लासाठी काही विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

News Desk

दाऊदच्या टोळीतील गँगस्टर ‘महाडिक’ अखेर पोलिसांच्या ताब्यात

News Desk

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल शोरुमला आग

News Desk
मुंबई

सर्व शिक्षा अभियान प्रवेश प्रक्रियेत बदल, गरजवंताना मिळणार न्याय

News Desk

मुंबई | केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियान RTE अंतर्गत २५ % आर्थिक दृष्टया कमकुवत गरीब लोकांच्या मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये राखीव जागांमधील प्रवेश प्रक्रियेत गेल्या ३ वर्षात नियमानुसार १ कि.मी.अंतरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मुलांना प्रवेश मिळत नव्हता. मात्र ३ कि.मी. अंतराच्या बाहेरील लोकांच्या मुलांना सहज प्रवेश मिळत होते त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत होता. गेल्या ३ वर्षात कोणीच राजकीय पक्षाच्या लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही किंवा त्याचा फायदा आपल्या मतदारांना मिळवून देताना दिसला नाही.

मात्र यावर्षी माहीम मधील ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या आणि साने गुरुजी विद्यालयाच्या पुढाकाराने ह्या अभियानाचे मार्गदर्शन शिबीर आणि मदत केंद्र चे आयोजन केले गेले. फक्त तितकेच न करता ह्या प्रक्रियेतील त्रुटी आणि घोळ पुराव्यानिशी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना निवेदनासोबत सादर केले. पालकरांनी यामध्ये जातीने लक्ष घालून ते पुढील कारवाईस पाठवले. संस्थेने ह्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना देखील त्याबाबत एक निवेदन दिले.

सदर बाब हि योग्य असल्याचे सिद्ध झाल्यावर राज्य सरकारने त्यात त्वरित बदलाव करून यापुढे स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिले जाईल व ते हि जमिनीवरून त्यांचा पत्ता जवळचा असल्यासच. कारण आजपर्यंत विभागा द्वारे पत्ता तपासणी झाल्यामुळेच घोळ झाला. तसेच यापुढे ह्या प्रक्रियेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासणार नाही. शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल संस्थेने शिक्षण अधिकारी महेश पालकर यांचे व राज्य सरकारचे आभार मानले तसेच समाधान व्यक्त केले कारण यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही असे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पळ यांनी सांगितले. संस्थेचे विलास फडके ,राज दुदवडकर, भरत राऊत, योगेश सारंगुळ, वनिता, प्रथमेश पाटील,किरण पळ , विनोद पळ यांनी अथक मेहनत घेतली.

Related posts

चक्क ट्रक चोरी करून गुजरातला पळाले अन्…; पहा कसं पकडलं मुंबई पोलिसांनी

Chetan Kirdat

ठाण्यात मिसळ महोत्सवाचेभव्य आयोजन

News Desk